शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

अवाजवी वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करावा, ठाकरे गट आक्रमक 

By चंद्रकांत शेळके | Published: April 06, 2023 2:10 PM

सध्या अनेक भागांमध्ये परस्पररित्या विजेचा खेळखंडोबा होत आहे. 

अहमदनगर : महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली १७ टक्के दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी नगरमध्ये उद्धव ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. अधीक्षक अभियंत्यांच्या  दालनात कार्यकर्त्यांसह नागरिकांनी ठिय्या दिला. सध्या अनेक भागांमध्ये परस्पररित्या विजेचा खेळखंडोबा होत आहे. 

अनेक भागांमध्ये कमी दाबाने वीज मिळत असल्यामुळे उद्योजकांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे त्या नागरिकांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकलेली नाही. दुसरीकडे नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या पाणी योजना आहेत, त्या योजनांवर सुद्धा वेळोवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नगर शहराला वर्षातून शंभर दिवसही पाणी मिळू शकत नाही.

विजेची अशी बोंबाबोंब असताना महावितरणने तब्बल १७ टक्के वीज दरवाढ केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. राज्यात एककिडे उन्हाचा पारा वाढत असताना राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपन्यांनी आपल्या वीज दरात भरमसाठ वाढ करून जनतेला ऐन उन्हाळ्यात शॉक दिला आहे. त्यामुळे तातडीने ही दरवाढ रद्द करून ग्राहकांना नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

याप्रसंगी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, दत्ता जाधव, योगी गाडे, अमोल येवले, संतोष ग्यानप्पा, संदीप दातरंगे, संजय सायगावकर, डॉ. श्रीकांत चेमटे, अरुण झेंडे, गौरव ढोणे, संतोष धमाल, दीपक  भोसले, शरद कोके, पंकज राठोड, नरेश भालेराव, सुनील भोसले, अक्षय नागापुरे, जालिंदर वाघ, महेश शेळके आदि शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर