शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

निळवंडेतूनही सोडले पाणी

By admin | Published: August 08, 2016 12:06 AM

राजूर/अकोले : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर या धरणातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

राजूर/अकोले : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर या धरणातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे त्याखालील निळवंडे धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली. परिणामी रविवारी निळवंडेतूनही २ हजार क्युसेक वेगाने प्रवरा पात्रात पाणी सोडण्यात आले. दरम्यान, आज पाणलोटात पावसाचा जोर एकदमच ओसरला आहे.एक-दोन दिवस वगळता भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळला. भंडारदरा भरल्यानंतर आता निळवंडेही भरण्याच्या मार्गावर आहे. रविवारी दुपारी निळवंडेचा साठा ७ हजार २०० द.ल.घ.फू.हून अधिक झाला. या धरणात पावसाळी परिस्थितीत ७ हजार द.ल.घ.फू ला पाणी पातळी स्थिर ठेवण्याचा विचार जलसंपदा विभागाने केल्यामुळे या धरणातून दुपारी दीड वाजता १ हजार ९९५ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली, असे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. रविवारी दिवसभर भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. भंडारदरा येथे तर दिवसभराच्या बारा तासांत अवघ्या ४ मि.मी. पावसाची नोंद झाली. संध्याकाळी ६ वाजता वीज निर्मितीसाठी टनेलमधून व अम्ब्रेला फॉलमधून एकूण १ हजार १७६ क्युसेकने विसर्ग सुरु होता. भंंडारदरा धरणातील पाणीसाठा १० हजार ५२० द.ल.घ.फू., तर निळवंडे धरणातील पाणीसाठा ७ हजार २३१ द.ल.घ.फू. होता. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पडलेला पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे : घाटघर १४२, भंडारदरा ५८, रतनवाडी १६९, वाकी १५५. (वार्ताहर)