शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
4
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
5
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
6
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
7
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
8
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
9
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
10
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
11
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
12
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
13
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
14
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
15
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
16
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य
17
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
18
1 October New Rules : Aadhaar, PPF, इन्कम टॅक्सपासून एलपीजीपर्यंत; आजपासून देशात १० मोठे बदल; खिशावर होणार परिणाम
19
रिव्हॉल्वरचे लॉक अडकलं अन्...; अभिनेता गोविंदाला गोळी कशी लागली?
20
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल

जिल्ह्याला पाजले ४६ कोटींचे पाणी

By admin | Published: July 31, 2016 1:01 AM

अण्णा नवथर, अहमदनगर दुष्काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती़ दुष्काळात जिल्ह्यातील १३ लाख नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला

अण्णा नवथर, अहमदनगरदुष्काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती़ दुष्काळात जिल्ह्यातील १३ लाख नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला असून, विविध संस्थांनी पुरविलेल्या पाण्यावर ४६ कोटींचा खर्च झाला असल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाले आहे़ गेल्या तीन वर्षांतील टँकरवरील खर्चाने यंदा उच्चांक गाठला आहे़गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात कमी पाऊस पडतो आहे़ त्यामुळे यंदाचा दुष्काळ भयावह होता़ दुष्काळ काळात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भीषण स्थिती निर्माण झाली होती़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर होता़ सरकारने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत मागेल तिथे टँकर देण्याची घोषणा केली होती़ मागील मार्च, एप्रिल, मे आणि जून हे चार महिने अत्यंत कठीण गेले होते़ या काळात जिल्ह्यातील टँकरनेही उच्चांक गाठला होता़ सर्वाधिक एप्रिलमध्ये ८२६ टँकर सुरू होते़ टँकरला मंजुरी जिल्हा प्रशासनाकडून दिली जाते़ परंतु प्रत्यक्ष कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत होते़ जिल्हा परिषदेने टँकरवर झालेल्या खर्चाचा अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनास सादर केला़ त्यानुसार एप्रिल ते १५ जुलै, या काळात टँकरसाठी ४२ कोटी खर्च झाले आहेत़ त्याचबरोबर नगरपालिका परिसरातील टँकरवर चालकांची ४ कोटींची उधारी झाली आहे़ शहर व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यावर ४६ कोटी रुपये खर्च झाले आहेत़ टँकर चालकांची देयके देण्यासाठी प्रशासनाने सरकारकडे निधीची मागणी केली होती़ त्याची दखल घेऊन सरकारने पहिला २४ कोटींचा हप्ता जिल्हा प्र्रशासनाकडे वर्ग केला आहे़ जिल्हा प्रशासनाने हा निधी जिल्हा परिषद व नगरपालिकांकडे सुपूर्द केला आहे़ जिल्हा परिषदेची ४२ कोटींची मागणी आहे़ त्यापैकी २० कोटी जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे़गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा टँकरवर सर्वाधिक खर्च झाला आहे़ दुष्काळात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असते़ परंतु एखाद्या गावात दरवर्षीच पुन्हा टँकर देण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने उपाययोजना राबविणे अपेक्षित आहे़ टँकर हा अखेरची उपाययोजना आहे़ परंतु इतर उपायोजनांना फाटा देवून टँकरवर भर देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणांकडून होत आहे़ त्यामुळे एकाच गावात पुन्हा पुन्हा टँकर देण्याची वेळ आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे़