शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

‘टंचाई’साठी जिल्हा परिषदेची बैठक गुंडाळली

By admin | Published: March 20, 2016 12:40 AM

अहमदनगर : शनिवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्यातील टंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठक बोलवली होती. याच दिवशी जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन समितीची बैठक होती.

अहमदनगर : शनिवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्यातील टंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठक बोलवली होती. याच दिवशी जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन समितीची बैठक होती. टंचाईच्या बैठकीमुळे जिल्हा परिषदेतील जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत जुजबी चर्चा करून ही बैठक आटोपती घेण्यात आली. बैठकीत तांदूळवाडी (ता. राहुरी) गावासाठी जलस्वराज्य योजनेतून पाणी योजना घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. बैठकीत तांदूळवाडी गावाला जलस्वराज्य टप्पा २ मधून मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा विषय अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी उपस्थित केला होता. यापूर्वी पाटील यांनी टाकळीमियाँ गावाला या योजनेत घेण्याचे सुचवले होते. मुळा धरण येथे मिरी-तिसगाव, बुऱ्हाणनगर, नेवासा या प्रादेशिक योजनेच्या पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी २४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोनई, करजगाव व १८ गावे पाणी योजनेचे काम रखडल्याबद्दल सुनिल गडाख यांनी नाराजी व्यक्त केली. काम पुर्ण होत नसल्याने सोनई गावाला टॅँकर सुरु करण्याची मागणीही त्यांनी केली. योजनेचे काम रखडवणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. बैठकीला उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती शरद नवले, मीरा चकोर, नंदा वारे, सदस्य हर्षदा काकडे, सुनील गडाख, सभापती संदेश कार्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)