शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

पाण्याचे टँकर बंद केल्याने जि.प. अध्यक्षा संतप्त

By admin | Published: August 05, 2016 11:42 PM

अहमदनगर : जिल्ह्यात अद्याप सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही.

अहमदनगर : जिल्ह्यात अद्याप सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यात शासनाने जिल्ह्यातील पाण्याचे टँकर बंद केले आहेत. ग्रामीण भागात यामुळे पाणीबाणी निर्माण झालेली आहे. यामुळे शासनाने तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना त्यांनी पत्र दिले आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या संख्येने पाण्याचे टँकर सुरू होते. उन्हाळ्यात हा आकडा ७५० च्या पुढे गेला होता. दरम्यान, जुलै महिन्यात झालेले पावसाने जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरची संख्या ३०५ पर्यंत खाली आली होती. शासनाने ३० जून ते २१ जुलैपर्यंत पाण्याचे टँकर सुरू ठेवण्यास मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर शासनाने जिल्ह्यात सर्वत्र पिण्याचे पाणी उपलब्ध झाले की नाही, याची खातरजमा न करताच पाण्याचे सर्व टँकर बंद केले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भू गर्भातील पाणीसाठा न वाढल्याने पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अध्यक्षा गुंड संतप्त झाल्या असून त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले आहे. यात त्यांनी तातडीने शासनाला अहवाल देवून पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय सुरू असणारे टँकरपारनेर ८७, श्रीगोंदा ७५, कर्जत ४५, संगमनेर ३९, नगर ३०, जामखेड २०, नेवासा ३, राहाता ३, राहुरी २, पाथर्डी १ यांचा समावेश आहे. शासन पाण्याचे टँकर सुरू करतांना तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना संयुक्त पाहणी करण्यास सांगते. मग बंद करतांना या दोघांनी एकत्र पाहणी करून टँकर बंद करावेत, अशी मागणी गुंड यांनी केली आहे.