शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

‘ग्रामज्योती’ अंतर्गत जिल्हय़ात होणार १२४ कोटींची कामे

By admin | Published: January 25, 2016 2:14 AM

ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचे बळकटीकरण होणार असून नऊ वीज उपकेंद्र प्रस्तावित आहेत.

अतुल जयस्वाल / अकोला: ग्रामीण भागात वीज वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरण, यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता असलेली केंद्र सरकारची दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राज्यातही लागू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत महावितरणकडून अकोला जिल्हय़ात १२४.३९ कोटींची कामे होणार आहेत. ग्रामीण भाग भारनियमनमुक्त करण्यासाठी जिल्हय़ात तब्बल नऊ वीज उपकेंद्रांच्या निर्मितीसह पायाभूत सुविधांची विविध कामे प्रस्तावित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सध्या ग्रामीण भागात वाढती वीज ग्राहक संख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वापर वाढला आहे. ग्रामीण भागातील विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने केंद्र सरकार पुरस्कृत दिनदयाळ उपाध्याय योजना राज्यात राबविण्याला मान्यता दिली आहे. देशातील सर्व राज्यांत ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यात महावितरणकडून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेंतर्गत फिडरचे विलगीकरण, उच्चदाब व लघुदाब वाहिन्या तसेच वीज उपकेंद्रांची निर्मिती व रोहित्रांचे सक्षमीकरण, अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ांमध्ये या योजनेंतर्गत विविध कामे प्रस्तावित आहेत. यापैकी अकोला जिल्हय़ात नऊ नवीन वीज उपकेंद्र उभारणे, सहा ठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर बसविणे, सात पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढ करणे, ३५३ ठिकाणी नवीन रोहित्रं बसविणे यासारखी एकूण १२४.३९ कोटी रुपयांची विविध कामे प्रस्तावित असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.