शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १.४२ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग

By रवी दामोदर | Published: July 25, 2023 3:14 PM

जिल्ह्यात या महिन्यात दि. १३, दि. १९, दि. २२ व दि. २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली आहेत

अकोला - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत अद्यापपर्यंतच्या सर्वेक्षणात प्राथमिक अंदाजानुसार १ लाख ४२ हजार ७५२ हेक्टर आर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पंचनामे व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत.

जिल्ह्यात या महिन्यात दि. १३, दि. १९, दि. २२ व दि. २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली आहेत. आपत्तीमुळे तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, तसेच स्थानिक बचाव पथकाने पुरामुळे अडकलेल्या ३० व्यक्तींना सुरक्षितस्थळी पोहोचविले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त २४८ कुटुंबाना सानुग्रह मदत देण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली. सर्वेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया प्रत्येक नुकसानाची अचूक नोंद घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.

१.३७ हेक्टरवरिल पिकांना फटका, २३ गुरे दगावलीजिल्ह्यात आतापर्यंतच्या झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आजरोजीपर्यंत झालेल्या सर्वेक्षणात प्राथमिक अंदाजानुसार, १ लाख ३७ हजार ६७८ हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तसेच ५ हजार ७४ हे. आर. शेतजमीन खरडून गेली. अतिवृष्टीत पशुधनातील १५ दुधाळ व ८ लहानमोठी अशी २३ जनावरे दगावली. तसेच जिल्ह्यातील १० रस्ते व ५ पूल अशा १५ पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.