शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
3
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
5
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
7
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
8
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
9
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
10
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
12
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स
13
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
15
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
16
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
17
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
18
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
20
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

पाणीटंचाई निवारण्यासाठी १४३.३५ कोटीचा निधी

By admin | Published: October 13, 2015 10:43 PM

शासनाने हाती घेतल्या तात्काळ उपाययोजना; अमरावती विभागाला १२.५५ कोटीचा निधी.

संतोष वानखडे/वाशिम : २0१५-१६ या वर्षात पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी शासनाने चार विभागांसाठी १४३ कोटी ३५ लाख ११ हजार रुपयांचा निधी १२ ऑक्टोबरला मंजूर केला. पावसाचे कमी प्रमाण आणि त्यातच जलपुनर्भरण व अन्य जलसंधारणच्या कामांबाबत जनजागृतीचा अभाव यामुळे जलपातळीत घट होत चालली आहे. यामुळे राज्यातील कित्येक गावांमध्ये हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाईचे सावट असते. उन्हाळ्यात बहुतांश गावे पाणीटंचाईच्या चटक्याने होरपळून जातात. यावर्षी तर भर पावसाळ्यातही राज्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागल्याचे विदारक चित्र आहे. पाणीटंचाईची धग कमी करण्यासाठी विंधन विहिर, नळ योजनांची विशेष दुरूस्ती, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, टँकरने पाणीपुरवठा, विहिर अधिग्रहण, गाळ काढणे आदी उपाययोजनांवर भर दिला जातो. २0१५-१६ या वर्षात पाणीटंचाईवर तात्पुरती मात करण्यासाठी राबविलेल्या व राबविण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाने केली होती. या मागणीची दखल म्हणून कोकण, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या चार विभागांसाठी १४३ कोटी ३५ लाख ११ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. कोकण विभाग ७.१६ कोटी, नाशिक विभाग २७.६४ कोटी, औरंगाबाद विभाग ९५.९८ कोटी व अमरावती विभाग १२.५५ कोटी रुपये असे निधीचे वाटप शासनाने केले आहे. सर्वाधिक अर्थात ९५.७५ कोटी रुपये खर्च ह्यटँकरने पाणीपुरवठाह्ण या सदराखाली होणार आहे. त्याखालोखाल नळ योजनांची विशेष दुरूस्ती १७.७८ कोटी, विहिर अधिग्रहण १५.८३ कोटी, विंधन विहिर ९.१७ कोटी आणि तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेवर ४.९४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

*अमरावती विभागाला १२.५५ कोटी

         अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील पाणीटंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना राबविल्या व आताही राबविल्या जात आहेत. पैशाअभावी उपाययोजना ठप्प पडू नये म्हणून शासनाने अमरावती विभागासाठी १२ कोटी ५५ लाख २८ हजाराचा निधी मंजूर केला. विंधन विहिरींसाठी १.८२ कोटी, नळ योजनांची विशेष दुरूस्ती ५.0६ कोटी, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना १.0९ कोटी, टँकरने पाणीपुरवठा २.११ कोटी, विहिर अधिग्रहण २.४३ कोटी अशा प्रमुख उपाययोजनांचा समावेश आहे.