शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

शेतकरी कुटुंबातील १.९२ लाख लाभार्थींच्या खात्यात महिन्याला जमा होईनात १५० रुपये!

By संतोष येलकर | Updated: April 29, 2023 17:07 IST

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी १५० रुपये अनुदानाची रक्कम जमा होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत एपीएल शेतकरी लाभार्थींना धान्याऐवजी दर महिन्याला प्रत्येकी १५० रुपये देण्याचा निर्णय शासनामार्फत गेल्या मार्चमध्ये घेण्यात आला; मात्र जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून लाभार्थी शेतकऱ्यांनी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला अद्याप प्राप्त झाली नाही.

त्यामुळे दोन महिन्यांचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यातील एपीएल रेशनकार्डधारक ३९ हजार ४३९ शेतकरी कुटुंबातील १ लाख ९२ हजार ३७५ लाभार्थींच्या खात्यात १५० रुपयांची रक्कम जमा होणे अद्याप बाकी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी १५० रुपये अनुदानाची रक्कम जमा होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारक लाभार्थींसह एपीएल केशरी रेशन कार्डधारक शेतकरी लाभार्थींना दरमहा रेशन दुकानांमधून सवलतीच्या दरात अन्नधान्याचे वितरण करण्यात येत होते. त्यामध्ये गेल्या जानेवारी २०२३ पासून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारक लाभार्थींना दरमहा मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून, एपीएल केशरी रेशन कार्डधारक शेतकरी लाभार्थींना गेल्या सहा महिन्यांपासून रेशन दुकानांमधून मिळणाऱ्या अन्नधान्याचा लाभ बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थींना धान्याऐवजी प्रतिमहा प्रतिव्यक्ती १५० रुपये देण्याचा निर्णय शासनाने गत मार्च महिन्याच्या प्रारंभी घेतला. त्यानुसार जानेवारी २०२३ पासून दरमहा प्रत्येकी १५० रुपये अनुदानाची रक्कम थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा करावयाची आहे; परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटून जात असताना, जिल्ह्यातील एपीएल शेतकरी कुटुंबातील लाभार्थींच्या खात्यात दरमहा १५० रुपयांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३९ हजार ४३९ एपीएल शेतकरी कुटुंबातील १ लाख ९२ हजार ३७५ लाभार्थींना दरमहा धान्याऐवजी प्रत्येकी १५० रुपये अनुदानाचा लाभ मिळणार केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

एपीएल शेतकरी कुटुंबांची अशी आहे संख्या !

तालुका             कुटुंबअकोला ग्रामीण ७,०१२अकोला शहर १,२२६अकोट             १०२०५बाळापूर             २,०७०

बार्शीटाकळी २,४७२

मूर्तिजापूर            ७,५५०

पातूर             २,३१२

तेल्हारा             ६,५९२