शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाणीटंचाईग्रस्त १४८ गावांसाठी १७८ विहीर-बोअरचे अधिग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 10:20 IST

पाणीटंचाईग्रस्त १४८ गावांसाठी १५ जुलैपर्यंत १७८ खासगी विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले असून, अधिग्रहित करण्यात आलेल्या विहीर व बोअरद्वारे पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

- संतोष येलकर

अकोला: पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या कायम असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त १४८ गावांसाठी १५ जुलैपर्यंत १७८ खासगी विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले असून, अधिग्रहित करण्यात आलेल्या विहीर व बोअरद्वारे पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; परंतु जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले अद्यापही कोरडी पडली असून, धरणांमधील जलसाठ्यांतही वाढ झाली नाही. पावसाने दांडी मारल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या कायम असून, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यातही ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने, जिल्ह्यातील सातही तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त १४८ गावांसाठी १५ जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनामार्फत १७८ खासगी विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये ६० विहिरी व ११८ बोअरचा समावेश आहे. अधिग्रहित करण्यात आलेल्या खासगी विहीर व बोअरद्वारे पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाळ्यातही अधिग्रहित करण्यात आलेल्या खासगी विहीर व बोअरच्या पाण्यावर पाणीटंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.दीड महिन्यात सरासरी केवळ १६६.३ मि.मी. पाऊस!जिल्ह्यात १ जून ते १५ जुलैपर्यंत सरासरी २४७.१ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत यावर्षीच्या पावसाळ्यात १५ जुलैपर्यंत दीड महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी केवळ १६६.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील धरणे, तलाव, नदी-नाल्यांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई