शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

 वऱ्हाडातील धरणात २० टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:54 IST

पश्चिम विदर्भातील  अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे

ठळक मुद्दे१८ धरणांपैकी पाच धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, पातळी शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४६.२० टक्के, तर एकबुर्जी धरणात ३४.१७ टक्के वाढ झाली आहे. मागील एक महिन्यात केवळ सहा टक्के एवढीच जलसाठ्यात वाढ झाली.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघु मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ५ जुलैपर्यंत केवळ २० टक्केच जलसाठा संचयित झाला. ४ जून रोजी या धरणांमध्ये १४ टक्के जलसाठा होता.  म्हणजेच पावसाळ््याच्या मागील एक महिन्यात केवळ सहा टक्के एवढीच जलसाठ्यात वाढ झाली. या उन्हाळ््यात तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.पश्चिम विदर्भातील  अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्'ातील १८ धरणांपैकी पाच धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, पातळी शून्य टक्के आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर ९.५५ टक्केच जलसाठा आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट अद्याप संपले नाही. याच जिल्ह्यातील निर्गुणा, उमाव मोर्णा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा २.७९, तर उतावळी धरणातील पातळी ३.१३ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात ११.५२ टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १०.३४ टक्के, पेनटाकळी धरणात २.२० टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.१८ टक्के, पलढगमध्ये ११.८५ टक्के, मन धरणात १०.४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४६.२० टक्के, तर एकबुर्जी धरणात ३४.१७ टक्के वाढ झाली आहे. 

 वाशिम जिल्'ातील धरणात वाढला जलसाठा!मान्सूनपूर्व पाऊस व त्यानंतर झालेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणातील जलसाठा १२ टक्क्यांहून ४६.२० टक्क्यांवर पोहोचला असून, याच जिल्ह्यातील एकबुर्जी धरणातील १०.७८ टक्क्याहून ३४.१७ टक्क्यावर पोहोचला आहे. बुलडाणा जिल्'ातील दोन धरणात १ ते २ टक्के वाढ झाली. अमरावती जिल्'ातील उर्ध्व वर्धा धरणात केवळ ३४.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ४८.६७, अरुणावती १५.४८ तर बेंबळा धरणात १६.५९ टक्केच जलसाठा आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वाण धरणात गत एक महिन्यात जलसाठा वाढला नसून, गतवर्षीचा ५८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणWaterपाणी