शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

२३ वर्षांनंतर खटल्याचा निकाल

By admin | Published: July 01, 2017 12:43 AM

व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यावरील गोळीबार प्रकरण; निकाल ऐकण्यासाठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रणजितसिंह चुंगडे याने २९ आॅगस्ट १९९३ मध्ये व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर सदर प्रकरणाचा निकाल तब्बल २३ वर्षांनंतर लागला. हा गोळीबार रमजान महिन्यात घडला होता व या प्रकरणाचा निकालही रमजान महिना संपून अवघे चार दिवस झाल्यानंतरच लागला अशीही चर्चा न्यायालय परिसरात होती. रणजितसिंह चुंगडे याला आठ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायालयात मोठी गर्दी झाली होती; मात्र त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चुंगडेला पाहण्यासाठीही काहींनी गर्दी केली होती; मात्र पोलिसांनी अनेकांना न्यायालयात प्रवेश दिला नाही.वयोमानामुळे दोन वर्षे शिक्षा कमीरणजितसिंह चुंगडे याचे वय ६० च्यावर असल्याने त्याच्या वयोमानाचा विचार करून १० वर्षांमधील दोन वर्षांची शिक्षा कमी ठोठावली. दोन वर्षांची शिक्षा कमी केल्यानंतर त्याला आठ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.अरुण गवळीनंतर चुंगडेवर टाडाचा गुन्हाया प्रकरणात पोलिसांनी रणजितसिंह चुंगडेवर टाडाचाही गुन्हा दाखल केला होता; परंतु २००२ मध्ये हा गुन्हा टाडाच्या विशेष न्यायालयाने खारीज केला होता. विशेष म्हणजे, मुंबईमध्ये अरुण गवळी याच्यावर टाडाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर विदर्भातील गुंडापैकी चुंगडेवर हा पहिलाच गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती आहे.दीडवर्ष कारागृहातरणजितसिंग चुंगडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो तब्बल एक वर्ष सहा महिने कारागृहात होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता, तर त्याचा साथीदार बजरंगसिंग राजपूत हा एक मार्च १९९४ पर्यंत कारागृहात होता. अशी झाली शिक्षा- भादंवि कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) - आठ वर्षांची शिक्षा, एक हजार दंड- भादंवि कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा)- दोन वर्षांची शिक्षा, एक हजार दंड- भादंवि कलम ५०६ (जीवे मारण्याची धमकी) -पाच वर्षांची सक्तमजुरी, एक हजार दंड - आर्म्स अ‍ॅक्ट ३/२५( विनापरवाना पिस्तुल वापरणे)- तीन वर्षांची सश्रम कारावास, एक हजार दंड- भादंवि २९४ अन्वये (अश्लील शिवीगाळ करणे) तीन महिन्यांचा सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड - या सर्व शिक्षा सोबतच भोगाव्या लागणार आहेत.१२ साक्षीदारांमध्ये बड्या अधिकाऱ्यांची साक्षअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी तथा गृह खात्याचे विद्यमान अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अशा प्रकारे १२ जणांची साक्ष नोंदविली होती.