शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

उत्तर प्रदेशातील ४२७ मजूर गावाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 5:07 PM

४२७ आश्रित मजुरांना शनिवारी अकोल्यातील बस स्थानक येथून उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यात  त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले.

अकोला :'लॉकडाऊन' मध्ये जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील ४२७ आश्रित मजुरांना शनिवारी अकोल्यातील बस स्थानक येथून उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यात  त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत लागू करण्यात आलेल्या 'लॉकडाऊन ' मध्ये विविध राज्यातील मजूर अकोला जिल्ह्यात  अडकले होते. या आश्रित मजुरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली होती. दीड महिन्याच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील आश्रित मजुरांना त्यांच्या गावाकडे पाठविण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये ९ मे रोजी उत्तर प्रदेशातील ४२७ आश्रित मजुरांना अकोल्यातील बस स्थानक येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे अमरावतीकडे रवाना करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता अमरावती येथून या मजुरांना विशेष श्रमिक रेल्वेगाडीने उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यात  त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे , अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार , उपजिल्हाधिकारी (रोहयो ) बाबासाहेब गाढवे , तहसीलदार विजय लोखंडे , नायब तहसीलदार विजय खेडकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते .१६ बसेसद्वारे पाठविले अमरावतीकडे !उत्तर प्रदेशातील जिल्'ातील आश्रित ४२७ मजुरांना गोंड जिल्'ातील त्यांच्या गावाकडे पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राज्य परिवहन महामंडळाच्या १६ बसेसद्वारे मजुरांना शनिवारी दुपारी १२.३० वाजता अकोला बस स्थानकावरून अमरावतीकडे रवाना करण्यात आले. तेथून विशेष गणित रेल्वेगाडीने सायंकाळी या मजुरांना त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगारUttar Pradeshउत्तर प्रदेश