शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

जिल्ह्यातील ५ हजार शेतकरी थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:22 AM

जिल्ह्यात ६६,३८४ शेती पंप असून या शेती पंपावर ५७९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. निर्लेखनाद्वारे महावितरणकडून शेतकऱ्यांना १४३ ...

जिल्ह्यात ६६,३८४ शेती पंप असून या शेती पंपावर ५७९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. निर्लेखनाद्वारे महावितरणकडून शेतकऱ्यांना १४३ कोटी रुपयांची सूट मिळाली आहे. तसेच कृषी वीज धोरण विलंब आकार आणि व्याज आणि सूट ५३ कोटी रुपये देण्यात आलेली आहे. वीज देयकाची दुरुस्ती करून ४२ लाखांची सूट शेतकऱ्यांना मिळाली आहे. थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांनी मार्च-२०२२ पूर्वी भरल्यास शेतकऱ्यांना १९० कोटी रुपये भरावे लागतील. म्हणजेच थकबाकीची अर्धी रक्कम माफ होणार आहे. सोबतच ७२ कोटी रुपये चालू देयकाची म्हणजे सप्टेंबर २०२० ते जून २०२१ या कालावधीतील रक्कम आहे.

उपविभागनिहाय थकबाकीमुक्त झालेले शेतकरी

महावितरणच्या अकोट उपविभागातून ९२१ शेतकऱ्यांनी, अकोला ग्रामीण उपविभातील ८०१ शेतकऱ्यांनी, मूर्तिजापूर उपविभातील ६४९ शेतकऱ्यांनी, बाळापूर उपविभातील ६०३ शेतकऱ्यांनी, बार्शी टाकळी उपविभातील ८०१ शेतकऱ्यांनी, तेल्हारा उपविभातील ६६८ शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन आपले थकबाकीचे वीज बिल कोरे केले आहे.

वीज यंत्रणा सक्षमीकरणारवर होणार खर्च

महावितरणच्या कृषी पंप वीज धोरण-२०२० नुसार थकबाकीची रक्कम भरणाऱ्या शेतकरी बांधवांस थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र मिळणार असून, यातून मिळणारा बहुतांश निधी हा स्थानिक पातळीवर वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणावर खर्च होणार आहे. धोरणानुसार जमा झालेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम गावाच्या विकासासाठी सोबतच ३३ टक्के रक्कम जिल्ह्यातील विकास कामावर खर्च होणार असल्याने या योजनेमुळे गावासोबतच जिल्ह्याचा कायापालट होण्यास मोठी मदत मिळणार आहे.