शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
2
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
3
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
4
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
5
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
6
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
7
गँगवॉर, मर्डर, एन्काउंटर : सावधान मुंबई बदलत आहे
8
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला
9
Harmanpreet Kaur एकटी लढली; पण शेवटी तिची एक चूक नडली!
10
मुंबई-हावडा मेल टायमर बॉम्बने उडवण्याची धमकी; जळगाव स्थानकावर २ तास तपासणी!
11
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
12
Video - "गोठ्यात झोपल्याने कॅन्सर बरा होतो, ब्लड प्रेशरही कंट्रोल"; भाजपा नेत्याचा अजब दावा
13
“भाजपातून ८० टक्के लोक आमच्याकडे”; शरद पवारांच्या विधानावर महायुतीतील मंत्र्यांचा पलटवार
14
गुजरातमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडले ड्रग्ज; ५००० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
15
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविले
16
काय आहे PM Internship Scheme? Reliance सह 'या' बड्या कंपन्यांमध्ये 'इंटर्न' होता येणार!
17
रामलीला ऐन रंगात आलेली! तेवढ्यात 'राम व रावण' खरोखरच एकमेकांना भिडले, लाथाबुक्क्या घालू लागले
18
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
19
सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?
20
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

पातूर तालुक्यातील ५,८३६ हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:32 AM

पांढुर्णा: पातूर तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने धरणे तुडुंब भरलेली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ...

पांढुर्णा: पातूर तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने धरणे तुडुंब भरलेली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. येथून जवळच असलेल्या निर्गुणा चोंढी धरणातून शुक्रवारी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील जवळपास १९ गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, तालुक्यातील ५,८३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामात पिकांची नासाडी झाली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांपासून आशा आहे. रब्बी हंगामासाठी निर्गुणा येथील चोंढी धरण हे वरदान ठरत आहे. शुक्रवारी धरणातून पाटबंधारे विभागातर्फे कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले. यामुळे चोंढी, चारमोळी, घोटमाळ, जांभ, आलेगाव, कार्ला, पिंपळडोळी, शेकापूर, भानुस, सस्ती, आसोला, अंबाशी, चरणगाव, विवरा, देऊळगाव, बाभूळगाव, तांदळी, बेलुरा आदी गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाटबंधारे विभागाच्यावतीने शुक्रवारी येथील धरणावर मशीनची पूजा करून पाणी सोडण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी वैभव आखाडे, आयुशी अग्रवाल, आत्तरकर, बाणचार, भावसर यांसह कर्मचारी उपस्थित होते. (फोटो)

------------------------हरभऱ्याचे क्षेत्र वाढले!

यंदा परिसरात रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. चोंढी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी गव्हाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना नापसंती दर्शविली आहे, तसेच उन्हाळी भुईमूग पिकापासून शेतकऱ्यांना आशा आहे.