शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

जिल्ह्यात आठ महिन्यांत ६२ महिला विकृत वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:22 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील आठ महिन्यांत ६२ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील आठ महिन्यांत ६२ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत. विशेष म्हणजे यासोबतच विनयभंग झालेल्या महिला-मुलींचीही संख्या ३०० च्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे़ मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना न्यायालयातून जन्मठेप, १० वर्षांपेक्षा अधिक कारावास, अशा प्रकारच्या शिक्षा झाल्याने अत्याचाराच्या घटना गत काही महिन्यांपासून कमी झाल्याचे वास्तव आहे़

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून पाहिजे तेवढे प्रयत्न केले जातात. यासोबतच गुन्हेगारीने डोकेवर काढू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक जी़ श्रीधर आणि अपर पोलीस अधीक्षक माेनिका राऊत या जिल्ह्यावर कटाक्षाने नजर ठेवून आहेत. असे जरी असले तरी जिल्ह्यात महिला आणि मुलींवर होत असलेले अत्याचार चिंतेचा विषय बनत आहे. विशेष म्हणजे आता महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्यात येत असल्याने अशा घटनांना काही प्रमाणात आळा बसत असल्याची माहिती आहे़

६२ महिलांवर झाले अत्याचार

जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६२ महिलांवर अत्याचार झाले आहेत.

यामध्ये बहुतांश प्रकरणे ही ग्रामीण भागातील असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवणे आता गरजेचे झालेले आहे.

पुढील काळात याबाबत कोणती पावले उचलली जातात याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. एकीकडे पोलिसांच्या तपासाची गती वाढत असताना दुसरीकडे त्याच तुलनेत गुन्हेही घडत आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत वाढ

जिल्ह्यात २०२१ या वर्षातील आठ महिन्यांत ६२ महिलांवर अत्याचार झाले आहेत. तर २०२० या वर्षातील आठ महिन्यांत ही आकडेवारी ४३ एवढी होती. तेव्हा जिल्ह्यात महिला, युवतींवर हाेत असलेल्या अत्याचारावर राेख लावण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी विविध उपक्रम सुरू केले असून, नराधमांच्या नांग्या ठेचण्यासाठी कठाेर पावले उचलली आहेत़

३०० पेक्षा अधिक विनयभंगांची नोंद

जिल्ह्यात अत्याचारांबरोबरच विनयभंगाच्या घटनांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत तब्बल ३०० पेक्षा महिला-मुलींचे विनयभंग झाले असल्याची नोंद आहे. २०२० या वर्षात ही संख्या यापेक्षा अधिक हाेती, अशी माहिती आहे़ तर तपासही शंभर टक्के पूर्ण झाला असून यामधील गुन्हेगारांना बेड्या ठाेकण्यात आल्या आहेत़

कामगिरी उल्लेखनीय

जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढले असले तरी दुसरीकडे मात्र, पोलिसांच्या तपासाची गतीही उल्लेखनीय आहे. कारण, झालेल्या ६२ अत्याचारांपैकी सर्व प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांंना यश आले आहे.