शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

पोलिस दलातील ७00 कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Published: May 21, 2014 11:37 PM

पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरीस प्रारंभ

अकोला : निवडणुकीची धामधूम संपताच पोलिस दलामध्ये बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. पोलिस ठाण्यांमध्ये दोन वर्ष पूर्ण केलेल्या जवळपास ७00 पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. बदल्यासंदर्भात बुधवारपासून पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासमक्ष हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी दुपारी १५0 पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासमोर हजेरी लावली. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. अशा कर्मचार्‍यांकडून पोलिस अधीक्षक कार्यालयाने बदलीसाठी अर्ज मागितले होते. त्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख ठेवली. त्यानंतर पुन्हा तारीख वाढविण्यात आली. जिल्ह्यामध्ये जवळपास २१00 संख्याबळ आहे. शासन नियमाप्रमाणे मंजूर संख्या बळाच्या ३0 टक्के कर्मचार्‍याच्या बदल्या करता येतात. अनेक पोलिसांनी बदलीसाठी विनंती अर्जासह प्रशासकीय बदलीच्या दृष्टिकोनातून अर्ज केले आहे. विनंती अर्जामध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचा समावेश असल्याने, अनेकांनी अर्ज केले आहेत. बुधवारी जिल्ह्यातील बदलीसाठी अर्ज केलेल्या १५0 पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांची भेट घेतली. भेटीदरम्यान पोलिस अधीक्षक मिश्र यांनी पोलिस कर्मचार्‍यांचा अडीअडचणी जाणून घेत, त्यांना विनंतीवरून का बदली हवी आहे. याबाबत चौकशीसुद्धा केली. चौकशीदरम्यान पोलिस अधीक्षकांना बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांची समस्या फार मोठी नसल्याने त्यांच्या सोयीनुसार बदली देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आणि प्रशासकीय सोयीनुसारच बदली होईल, असे स्पष्ट केले. बदल्यांसाठी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या भेटीचा कार्यक्रम आणखी चार ते पाच दिवस चालणार आहे. २७ किंवा २८ मे रोजी पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांसंदर्भातील यादी तयार होईल आणि त्यानुसार पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. जवळपासचे पोलिस ठाणे मिळावे किंवा शहरातीलच पोलिस ठाणे देण्यात यावे, यासाठी अनेक पोलिस कर्मचारी आपआपल्या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे समजते.