शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मूर्तिजापूरात नोंदणी ७ हजार शेतकऱ्यांची; माल विकला २ हजार शेतकऱ्यांनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:03 IST

Agriculture Sector, Akola Farmer शेतकऱ्यांनी ई-नाम योजनेकडे  पाठ फिरविली आहे.

- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा धान्य माल ई- लिलावानुसार खरेदी करण्यासाठी १४ एप्रिल २०१६ पासून ई-नाम योजना सुरू केली आहे. ही योजना येथील बाजार समितीने अमलात आणली असली तरी शेतकऱ्यांनी याकडे  पाठ फिरविली आहे. तर या योजनेपासून अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक लिलावालाच पसंती दर्शवली आहे.आतापर्यंत ई-नाम योजनेंतर्गत मूर्तिजापूर बाजार समितीत ७ हजार ९४८ शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. पैकी केवळ २ हजार ४७० शेतकऱ्यांनी आपला माल विकला आहे. यासाठी ८७ अडते व ५९ व्यापाऱ्यांनीही आपली नोंदणी केली आहे. या योजनेत माल विक्रीसाठी कमालीचा वेळ लागतो व कुठल्याही व्यापाºयाला कुठेही माल खरेदी करण्याची मुभा असल्याने अनोळखी व्यापाºयाकडून विक्री रक्कम मिळेल याची हमी नाही.पारंपरिक लिलावात ठरलेल्या व्यापाºयाकडून आगाऊ रक्कम घेण्याची प्रथा असल्याने ज्या दिवशी माल विकल्या जाईल, त्या दिवशी रक्कम कपात होते. शेतकºयांची ही अडचण व्यापारी भागवित असल्याने पारंपरिक लिलावच शेतकºयांसाठी सोईचा असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.या योजनेंतर्गत बाजार समितीमध्ये शेतमालाच्या पारंपरिक बोली पद्धतीचे लिलाव बंद करून त्याऐवजी आॅनलाइन लिलावासाठी ई-नाम हे व्यापार पोर्टल तयार करण्यात आले. सरकारने यासाठी बाजार समितीला ३० लाख रुपये किमतीचे संगणक, प्रिंटर, राउटर यांच्या खरेदीसह शेतमालाच्या गुणवत्ता व आर्द्रता तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात आली. मिळविलेले अनेक साहित्य या बाजार समितीसाठी निरुपयोगी ठरले.

अशी आहे ई-नाम योजनाई-नाम (इंटरनॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केटिंग) या योजनेत मालाची गुणवत्ता तपासणी केली जाते. तो अहवाल शेतकºयाला मिळतो. शेतमालाचा फोटो पोर्टलवर अपलोड केला जातो. त्यानंतर मोबाइल अ‍ॅपवरून देशातील कोणताही व्यापारी कुठेही बसून लिलावात भाग घेऊ शकतो. व्यापारी आणि शेतकºयांना ही प्रक्रिया आनलाइन दिसते. शेतकरी मिळणाºया दराबाबत समाधानी असेल तरच मालाची खरेदी-विक्री होते. या लिलाव प्रक्रियेत अडते आणि मध्यस्थ नाहीत. मालाचे वजन झाल्यानंतर प्रत्यक्षात अडत्याला त्याचा ताबा मिळण्यापूर्वीच शेतकºयाच्या खात्यावर आॅनलाइन पैसे जमा केले जातात. देशातील कोणत्याही बाजारात मालाची विक्री करता येते.केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेत बाजार समिती दुसºया टप्प्यात आहे. सद्यस्थितीत शेतकºयांची नोंदणी करणे व त्यांच्या मालाचा ई-लिलाव करण्यासाठी बाजार समिती प्रयत्नरत आहे.- रितेश मडगे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूर

 

 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती