शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

जिल्ह्यात ९९७ गावे टंचाईसदृश

By admin | Published: May 22, 2014 11:42 PM

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश: विविध सवलती मिळणार

अकोला : गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवारी काढला आहे. त्यानुसार टंचाईसदृश गावांना विविध सवलती मिळणार आहेत.गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी जिल्ह्यातील पिकांच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. या पृष्ठभूमीवर सन २०१३-२०१४ या वर्षात जिल्ह्यातील ९९७ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांमार्फत गेल्या मार्चअखेर जाहीर करण्यात आले होते. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाच्या गत ३० एप्रिल रोजीच्या निर्णयानुसार अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अकोला जिल्ह्यात खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवार, १९ मे रोजी काढला. टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये शासन निर्णयानुसार विविध सवलती देण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह सर्वच संबंधित विभाग आणि यंत्रणांच्या अधिकार्‍यांना आदेशात दिले आहेत.

** टंचाईसदृश गावांना अशा मिळणार सवलती!-जमीन महसुलात सूट-सहकारी कर्जांचे रुपांतरण-शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती-वीज बिलात ३३.५ टक्के सूट-परीक्षा शुल्कात माफी-रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता-पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक तेथे टँकर्सचा वापर-शेतकर्‍यांच्या कृषिपंपांची वीज जोडणी खंडित न करणे

** ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेली तालुकानिहाय गावे!तालुका गावेअकोला १९१बार्शीटाकळी १५६आकोट १८३तेल्हारा १०६बाळापूर १०३पातूर ९४मूर्तिजापूर १६४एकूण ९९७