शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दोन हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 09:28 IST

Akola News : जिल्ह्यात २ हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकी आहे.

अकोला : दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणाऱ्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. जिल्ह्यात २ हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांमुळे आर्थिक स्थिती बिकट झालेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीची घोषणा करून मोठा दिलासा दिला. अल्पावधीतच घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार करून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्तीसुद्धा जाहीर केली. त्यानंतर प्रक्रिया गतीने राबवून जिल्हानिहाय पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे अपलोडिंग करण्यात आले व विनाअवकाश कर्जमुक्तीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या जाहीर सुद्धा करण्यात आल्या; परंतु कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळविण्यासाठी पात्रता यादीतील शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे असल्याचे योजनेच्या अटींमध्ये नमूद आहे.

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत सहकार विभागाने जिल्हा सहकारी बँक व अन्य खासगी-सार्वजनिक बँकांच्या मदतीने १ लाख १४ हजार ७४३ शेतकऱ्यांची नावे सरकारने या कर्जमाफी योजनेसाठी तयार केलेल्या स्वतंत्र संकेतस्थळावर अपलोड केली होती. त्यातील १ लाख ४ हजार ३६९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे आधार प्रमाणीकरणही करण्यात आले आहे. उर्वरित २ हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी राहिले आहे.

मृत शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण कसे होणार?

या याद्यांमधील हजारो शेतकरी हयात नसल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण करायचे कसे, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी