शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

राज्यातील बाजार समित्यावर नेमणार प्रशासक मंडळ !

By admin | Published: March 27, 2015 1:24 AM

हालचालींना वेग,माजी संचालक मंडळाला मात्र निवडणुकांचे वेध.

अकोला: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक मंडळ नेमण्यात येणार असल्याचे संकेत असून,त्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, बाजार समित्यांच्या माजी संचालकांना मात्र निवडणुकीचे वेध लागले आहेत. मागील वर्षी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने पणन विभागाने या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार शासकीय प्रशासकांकडे सोपवला होता. पण शेतकर्‍यांना पुरक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माजी संचालक मंडळांनी शासनाकडे केल्याने या तक्रारींच्या आधारे तत्कालीन आघाडी शासनाने या बाजार समित्यांवर प्रशासक मंडळ नेमून प्रशासकपदाचा पदभारही सभापतींकडे सोपविला होता. राज्यात युतीचे सरकार येताच हे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, या बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. पण पुन्हा राज्यातील काही बाजार समित्याचे एकत्रीकरण करू न प्रशासक मंडळ नेमण्याच्या हालचालींना सुरू वात झाल्याचे संकेत आहेत. दरम्यान,मागीलवर्षी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ संपल्याने या समितीचे माजी सभापती शिरीष धोत्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेऊन बाजार समितीचा कारभार विद्यमान संचालक मंडळाकडे ठेवण्यासाठीचा स्थगनादेश मिळविला होता. तथापि, त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका जाहीर न झाल्याने आणि या स्थगनादेशाची मुदत संपल्याने सहकार पणन विभागाने बाजार समितीवर शासकीय प्रशासकाची नियुक्ती केली होती.