शहरं
Join us  
Trending Stories
1
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
2
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
4
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
5
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
6
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
7
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
8
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
9
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
10
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
11
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
12
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
13
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?
14
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
15
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
16
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
17
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
18
Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
19
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
20
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार

शाश्वत शेती विकासात कृषी विज्ञान केंद्रांचे योगदान

By admin | Published: May 19, 2014 7:17 PM

कृषी विज्ञान केंद्राच्या कृती आराखडा कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ दाणी यांचे प्रतिपादन.

अकोला : बदलत्या जागतिक आव्हानाचा सामना करताना विदर्भातील शेती व शेतकरी समृद्ध व त्यांच्यामध्ये ती क्षमता निर्माण करण्याचे काम करावे लागणार असून, कृषी विज्ञान केेंद्राचे शाश्वत शेती व कोरडवाहू तंत्रज्ञानाला भक्कम योगदान असले तरी, या तंत्रज्ञानचा प्रभाव या विज्ञान केंद्रांनी पडताळून पाहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. रविप्रकाश दाणी यांनी सोमवारी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत विदर्भातील अकराही जिल्ह्यात कार्यरत कृषी विज्ञान केंद्राच्या कृती आराखडा कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी त्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी डॉ. दाणी बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र विभागीय प्रकल्प संचालक डॉ. एन. सुधाकर, संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले, शिक्षण विस्तार संचालक डॉ. विजय माहोरकर, डॉ. व्ही.एम. भाले, डॉ. सी.एन. गांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. दाणी यांनी, कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार जिल्हापातळीवर करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पुरविली जात असल्याचे सांगितले. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात शेतकर्‍यांच्या शेेती करण्याच्या पद्धतीत तंत्रज्ञानाला अनुकूल बदल बघायला मिळत आहेत. शेतकर्‍यांना व्यावसायभिमुख करण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. डॉ. सुधाकर यांनी विदर्भाच्या शेती विकासात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीचे नव तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविले जात आहे. त्यामुळे येणार्‍या काही वर्षात विदर्भातील शेती अधिक समृद्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी आम्ही सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या कार्यशाळेला उपस्थित विदर्भातील १३ कृषी विज्ञान केंद्र्राच्या कार्यक्रम समन्वयकांनी कृषी विज्ञान केंद्राचा गतवर्षीच्या कामकाजाचा आढावा व यावर्षीचे नियोजन सादर केले.