शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Akola: १६ मेपूर्वी कापूस बियाण्याची विक्री केल्यास होणार कारवाई! कृषी विभागाचे आदेश

By रवी दामोदर | Updated: May 6, 2024 16:09 IST

Akola News: राज्यात  २०१७ च्या खरीप हंगामातील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रिय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

- रवी दामोदर अकोला - राज्यात  २०१७ च्या खरीप हंगामातील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रिय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी दि. १६ मे २०२४ पासून कापूस बियाणे  शेतकऱ्यांना उपलब्ध होणार  आहे. त्यापूर्वी बियाण्याची विक्री केल्यास संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. यासंदर्भात कृषी विभागाने विभागीय कृषी सहसंचालक यांना आदेशित केले आहे.

कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगामपुर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत यंदा शेंदरी बोंड अळीच्या प्रार्दुभावास आळा घालण्याकरीता हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही. या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दि. १६ मेपासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन प्रत्यक्ष लावगड ही १ जून २०२४ नंतरच होणार आहे. कटाक्षाने पालन केल्यास शेंदरी (गुलाबी) बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रीत करणे शक्य होणार आहे. याकरीता क्षेत्रीयस्तरावर कटाक्षाने पालन करणे बाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी काटेकोर नियोजन करुन अंमलबजावणी करावी व विभागीय कृषि सहसंचालक यांनी त्यावर सनियंत्रण ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. कापूस बियाणे पुरवठा करणेबाबत निर्देशित दिनांक पुढीलप्रमाणे

१. उत्पादक कंपनी ते वितरक ०१ मे २०२४ ते १० मे २०२४.

२. वितरक ते किरकोळ विक्रेता १० मे २०२४ नंतर

३. किरकोळ विक्रेता ते शेतकरी १५ मे २०२४ नंतर

४. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवड १ जूननंतर 

कापूस बियाण्याची विक्री दुकानदार यांनी शेतकऱ्यांना १५ मे नंतर करता येईल, परंतु शेतकरी बांधवांनी सेंद्रिय बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता १ जून नंतरच बियाण्याची लागवड करावी. - शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र