शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

खरीप तोंडावर; पीक कर्ज वाटप १४ टक्क्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:47 IST

पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.

- संतोष येलकर

अकोला: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप दीड महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले; मात्र खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १५ मेपर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ५४३ शेतकऱ्यांना १९४ कोटी ५७ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.२०१९-२० या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह, ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत गत १ एप्रिलपासून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत असताना, जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत १५ मेपर्यंत २२ हजार ५४३ शेतकºयांना १९४ कोटी ५७ लाख रुपये (१४ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ चार दिवसांचा कालावधी उरला असून, खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच आहे. पीक बँकांकडून संथ गतीने पीक कर्जाचे वाटप सुरु असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ३०४ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांना १ हजार २०४ कोटी २१ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बँकनिहाय असे आहे पीक कर्जाचे वाटप!बँक                                                   शेतकरी                                रक्कम (कोटी)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक           १९,६९६                               १६४.७१राष्ट्रीयीकृत बँका                               २,१०२                                  २३.१५ग्रामीण बँक                                        ७४५                                      ०६.७१शेतकरी अडचणीत शेती मशागतीच्या कामांसह बियाणे व खते आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते; परंतु खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना जिल्ह्यात पीक कर्जाचे वाटप १४ टक्क्यावरच असल्याने, १ लाख ५२ हजार ३०४ शेतकºयांना पीक कर्जाचा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत खरीप पेरीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज