शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल
2
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
3
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
4
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
5
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
6
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
7
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
8
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
9
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
10
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
11
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
12
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
13
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
14
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
15
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
16
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
17
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
18
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
19
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
20
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद

कोरडवाहु शेती अभियानातुन अकोला जिल्ह्याला वगळले !

By admin | Published: May 19, 2014 7:17 PM

मागील वर्षी कोरडवाहु शेती अभियानात अकोला जिल्ह्याचा सामावेश; यावर्षी मात्र जिल्ह्याला वगळले.

अकोला : कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या उपजीविकेला स्थैर्य देण्यासाठी राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम हाती घेतला आहे. या अभियानावर येत्या पाच वर्षात दोन हजार कोटी खर्च केला जाणार असून, यंदा राज्यातील ४०३ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटीचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु अकोला जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील पिकाखालील क्षेत्र २२५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमिततेचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेत होत असल्यामुळे या क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या उपजीविकेला अद्यापही स्थैर्य प्राप्त होऊ शकले नाही. या क्षेत्रात पडणारा पाऊस आणि उपलब्ध स्थानिक संसाधनांचे नियोजन व कृषीपूरक उपक्रमांसाठी सहाय्य केल्यास कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नात सातत्य टिकवता येईल व त्यामुळे स्थैर्य प्राप्त होऊ शकेल. या उद्देशाने राज्य शासनाने गतवर्षापासून राज्यात कोरडवाहू शेती अभियानांतर्गत मणुष्यबळ विकास व शेतीला लागणारी विविध संसाधने, प्रक्रिया व पणन या घटकांचा वापर करण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमासाठी येत्या पाच वर्षात २० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. त्यातील दोन हजार कोटीची तरतूद कोरडवाहू शेती अभियान योजनेस स्वतंत्ररित्या उपलब्ध करू न देण्यात आली आहे. यंदा ४०३ गावांत हे अभियान राबविण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार,जळगाव, पुणे, अहमदनगर,सोलापूर,सातारा,सांगली,लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली नांदेड, औरंगाबाद,जालना, बीड, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील १६२ गावांचा समावेश करण्यात आला आहे; परंतु २०१३-१४ मधील या गावांचे अर्थात हे दुसरे वर्ष आहे. यावर्षीपासून नवीन प्रशासकीय परिपत्रकानुसार २०१४-१५ यावर्षासाठी राज्यातील १०८ व १३३ गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे; परंतु नेमके अकोला जिल्ह्याला यातून वगळण्यात आले आहे. या नवीन यादीत उर्वरित गावे असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्र्रत्येकी एक गाव निवडण्यात आले होते. यामध्ये सारकिन्ही, गाजीपूर टाकळी, लामकाणी, मालठाण बु., काजीखेड, भंडारज या गावांचा समावेश होता.