शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

अकोला जिल्हय़ातील ९0 हजार कुटुंब शौचालयाविना!

By admin | Published: October 03, 2016 2:34 AM

कुटुंबस्तर संवाद अभियानार्तंंंगत २४ हजार कुटुंबांना दिल्या भेटी!

अतुल जयस्वाल अकोला, दि. 0२- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची महाराष्ट्रात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने २२ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर या कालावधीत ह्यस्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी-कुटुंबस्तर संवाद अभियानह्ण राज्यभर राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने या अभियानांतर्गत जिल्हय़ातील सात तालुक्यातील २४,२0६ कुटुंबांना भेटी देऊन त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या अभियानांतर्गत २८,0५४ कुटुंबांना भेटी देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश उद्दिष्ट गाठण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ह्यस्वच्छतेचा जागरह्ण करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चालू वर्षातील शौचालयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शासनाने कंबर कसली असून, या कामांना गती देण्याच्या उद्देशाने २२ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर या कालावधीत ह्यस्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख भेटी : कुटुंबस्तर संवादह्ण अभियान राबविण्यात आले. जिल्हय़ात आकोट तालुक्यातील पळसोद या गावातून २२ ऑगस्ट रोजी जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या हस्ते या अभियानास प्रारंभ करण्यात आला. गत सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तालुका व पंचायत स्तर समिती स्तरावर गठित करण्यात आलेल्या पथक व समित्यांद्वारे गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देण्यात आल्या. लोकांना शौचालयांचे महत्त्व पटवून देऊन शौचालय उभारण्यासाठी असलेल्या शासनाच्या योजनेची माहिती देण्यात आली. या अभियानामुळे लोकांमध्ये शौचालयांबाबत जनजागृती होऊन अनेकांनी शौचालयांचे बांधकामही केले आहे. लाखांवर कुटुंबांनी शौचालय बांधले!सप्टेंबरपर्यंंंत जिल्हय़ातील २ लाख १२ हजार ६४१ कुटुंबांपैकी केवळ १ लाख २१ हजार ८३३ कुटुंबांनी शौचालयांचे बांधकाम केले आहे. अद्यापही ९0 हजार ८0८ कुटुंब शौचालयांविना असल्याने जिल्हा हगणदरीमुक्त होण्यात अडचणी येत आहेत.