शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांना समर्पित - खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:27 IST

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केल्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचे भाजपचे उमेदवार खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी सांगितले.

- आशिष गावंडे  पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण ठेवत विविध योजनांची पूर्तता केली. मोदींवरील दृढविश्वासामुळेच यंदा मतदारांनी आमच्या पारड्यात गतवेळीपेक्षाही अधिक मतांचे भरभरून दान दिले आहे. निवडणुकीत भाजप-शिवसेना, रिपाइंसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केल्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचे भाजपचे उमेदवार खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी सांगितले.प्रश्न : यंदाच्या निवडणुकीत कशाचे आव्हान होते?उत्तर : निवडणूक कोणतीही असो, ती धैर्य आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास, निष्ठेने सामोरे जा यश तुमचेच राहील. जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालण्यापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिल्यामुळे यापूर्वीही कधी निवडणुकीत कोणाचे आव्हान नव्हते.प्रश्न : वाढीव मतदानाचा फायदा झाला असे वाटते का?उत्तर : नक्कीच फायदा झाला. यंदा १ लाख ४४ हजार ४७८ नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज रोजी सुशिक्षित युवक-युवतींना समाजहितासोबतच देशहित महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळेच वाढीव नवीन मतदारांची सर्वाधिक मते ही भाजपाच्या पारड्यात पडली आहेत.प्रश्न :कोणत्या मुद्यांना प्राधान्य देणार आहात?उत्तर : २०१४ मध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने विकास कामांना सुरुवात झाली, हे विसरता येणार नाही. या कालावधीत जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती दिली असून, ते पूर्ण होतील, हा विश्वास आहे. येत्या काळात सिंचनासह प्रामुख्याने रस्त्यांची समस्या दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.प्रश्न : मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची अपेक्षा आहे का?उत्तर : मी कधीही पदाच्या लालसेने काम केले नाही. जिल्ह्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा प्रामाणिकपणे विस्तार केला. संघटन बांधणी केली. सर्व जाती-धर्माचे कार्यकर्ते जोडले. याची अनेकांना जाणीव आहे. केंद्र व राज्यात सत्ता नसतानाही जिल्हावासीयांनी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना सातत्याने विजयी केले. योग्यतेपेक्षा जास्त काही मिळू नये, असे मला वाटते. जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो पक्ष नेतृत्व घेईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालakola-pcअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेBJPभाजपा