शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अकोला :  ही हलगर्जी कोरोनाचा प्रकोप वाढवणारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:29 IST

प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लोकांची बेफिकीर वृत्ती, यंत्रणेची हलगर्जी यामुळे अकोल्यात कोरोनाचा प्रकोप वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देवाढती रुग्णसंख्या, मृत्यूचा दर यामध्ये अकोला आघाडीवर आहे. दुकानांवरची गर्दी ओसंडून वाहताना दिसते.आता भाजी बाजार बंद केले; मात्र किराणांवरील गर्दी कमी होत नाही.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आले, संचारबंदी लावण्यात आली. अकोल्यात मात्र २२ मार्चचा जनता कर्फ्यू व त्यानंतरचे दोन दिवस बऱ्यापैकी शिस्त होती; नंतर मात्र डबलसीट, ट्रिपलसीटपासून रस्त्यावरच्या गर्दीचे चित्र कमी-अधिक फरकात कायमच राहिले. त्यात आता मूर्तिजापूरच्या घटनेनंतर प्रशासकीय हलगर्जीची भर पडली आहे. प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लोकांची बेफिकीर वृत्ती, यंत्रणेची हलगर्जी यामुळे अकोल्यात कोरोनाचा आणखी प्रकोप वाढवणारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.अमरावती, नागपूर, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत अकोल्याची लोकसंख्या व प्रगती एकदमच कमी आहे; मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत आपण टक्केवारीमध्ये या शहरांनाही मागे टाकले आहे. वाढती रुग्णसंख्या, मृत्यूचा दर यामध्ये अकोला आघाडीवर आहे. सद्यस्थितीत अकोल्यात ४४ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत; परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कमीच आहे.एकीकडे आरोग्य यंत्रणेतील योद्धा कोरोनाशी दोन हात करत जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहेत, तर दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर अक्षम्य अशी हलगर्जी दिसत आहे.हातगाडीवर मृतदेह नेण्याचा प्रकार असो की मूर्तिजापूरमध्ये अंत्यसंस्काराची घटना असो, प्रशासन डोळे झाकून काम करते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. उल्हासनगर येथे मूर्तिजापूरसारखाच प्रकार घडला, कोरोनाचा चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व विधी पाळण्यात आल्या. केवळ २० लोकांना परवानगी असताना त्यापेक्षा अधिक लोक होते. अंत्यसंस्कार झाले त्या मृतकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांची तपासणी झाली असता तब्बल १० लोकांना बाधा झाल्याचे समोर आले. आता या प्रकरणात याप्रकरणी नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. हे उदाहरण ताजे असतानाच मूर्तिजापुरात चूक घडली त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, तरच भविष्यात दक्षता घेतल्या जाईल, कारण कोरोनाचे संकट मोठे आहे.

...तर नोडल आॅफिसरची मागणी होईलअकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. दुसरीकडे यंत्रणांची हलगर्जी समोर येत आहे. पालकमंत्र्यांनी दोन दिवसांचा वर्ग घेतला. नेहमीच्या स्टाइलमध्ये हंगामा करण्यासाठी स्टिंगचा प्रयोगही केला. नंतर ‘जैसे थे’. सर्वोपचारमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड, साधनांचा अभाव अशा अनेक गोष्टी या सोशल मीडियातून बाहेर येत आहेत. या सर्व बाबींमधून रुग्णांचा सर्वोपचारवर विश्वास डळमळीत होत गेला तर यंत्रणांनी आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल अन् सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सोलापूरच्या धर्तीवर नोडल आॅफिसरची मागणी होईल. त्यामुळे आतापर्यंत परिश्रम घेतले आहेत. त्यामध्ये फक्त पारदर्शकता अन् सातत्य हवे तरच रुग्णांना सर्वोपचारचा अन् प्रशासकीय यंत्रणेचा आधार वाटेल.

किराणा नेता की कोरोना?लॉकडाउमध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना सवलत दिली आहे; मात्र ही सवलत जणू बाहेर पडण्याची संधीच आहे असे समजून प्रत्येक दुकानांवरची गर्दी ओसंडून वाहताना दिसते. तेच चित्र भाजी बाजाराचेही होते. आता भाजी बाजार बंद केले; मात्र किराणांवरील गर्दी कमी होत नाही. दुकानांमध्ये जाणाºया बहुतेकांकडे मास्कही नसतात. फिजिकल डिस्टन्सिंग तर दूरच राहिले. अशा स्थितीत आपण किराणा नेतो की कोरोना, याचाही विचार नागरिकांनी केला पाहिजे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला