शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अकोला : शास्ती अभय योजनेसाठी तीन दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:48 IST

अकोला : शहरातील मालमत्ताधारकांना थकीत कर जमा करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत शास्ती अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे.  २0१६-१७ मधील थकीत मालमत्ता कराची रक्कम जमा केल्यास मालमत्ताधारकांना शास्तीच्या आकारणीतून सूट मिळणार असून, त्यासाठी केवळ तीन दिवसांची मुदत बाकी आहे.

ठळक मुद्देमालमत्ता करावर शास्तीच्या आकारणीतून मिळणार सूट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील मालमत्ताधारकांना थकीत कर जमा करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत शास्ती अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे.  २0१६-१७ मधील थकीत मालमत्ता कराची रक्कम जमा केल्यास मालमत्ताधारकांना शास्तीच्या आकारणीतून सूट मिळणार असून, त्यासाठी केवळ तीन दिवसांची मुदत बाकी आहे. त्यानंतर प्रशासनाने थकीत करावर शास्तीची आकारणी लागू केल्यास संबंधितांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे थकीत मालमत्ता कराचा भरणा तातडीने करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. महापालिका प्रशासनाने दर तीन वर्षांनंतर शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे अपेक्षित असताना १९९८ ते २0१६ पर्यंत पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया झालीच नाही. १८ वर्षांच्या कालावधीत शहरात नव्याने किती मालमत्तांचे निर्माण झाले, याचा प्रशासनाच्या मालमत्ता कर विभागाकडे कोणताही लेखाजोखा उपलब्ध नव्हता. कर वसुली लिपिकांच्या जुजबी आकडेवारीनुसार प्रशासनाच्या दप्तरी ७२ हजार मालमत्तांची नोंद होती. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकनच नसल्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न अवघे १६ ते १८ कोटी रुपये होते. मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या कर वसुली विभागाला घरघर लागल्यामुळे प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. उत्पन्न वाढीसाठी शासनाचे निर्देश लक्षात घेता मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मालमत्ता कराच्या रकमेत वाढ करण्यासाठी ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली. यादरम्यान, ३१ हजार मालमत्ताधारकांना कर आकारणी झाली नसल्याचे उघड झाले. 

१ लाख ५२ हजार २३0 मालमत्तांची नोंदमहापालिका प्रशासनाने केलेल्या ‘जीआयएस’ सर्व्हेदरम्यान नवीन प्रभाग वगळून शहरात १ लाख ४ हजार २३0 मालमत्तांची नोंद झाली होती. त्यानंतर नवीन प्रभागात सर्वेक्षण केले असता ४८ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली. आजरोजी १ लाख ५२ हजार २३0 मालमत्तांची अधिकृत नोंद झाली असून, प्रशासनाने सुधारित दरानुसार कर आकारणी केल्यानंतर तिजोरीत ६२ कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा होईल. आजपर्यंत अत्यल्प कर जमा करणार्‍या नागरिकांनी थकीत कराचा भरणा करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

काय आहे अभय योजना?२0१६-१७ या कालावधीत ज्या नागरिकांक डे मालमत्ता कर थकीत आहे, त्यांच्यासाठी महापालिकेने ३१ जानेवारीपर्यंत शास्ती अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतीत नागरिकांनी थकीत मालमत्ता व पाणी पट्टी कर जमा केल्यास त्यांना शास्तीचा अतिरिक्त भुर्दंड भरावा लागणार नाही. ३१ जानेवारीनंतर संबंधित मालमत्ताधारकांवर शास्तीची आकारणी केली जाणार आहे. शास्ती लागू झाल्यास नागरिकांच्या मालमत्ता कर आकारणीत मोठी वाढ होणार आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका