शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
2
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
3
"या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा मविआचा कट, आतातरी बुद्धी यायला हवी"
4
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
5
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
6
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
7
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 
8
सुजय विखेंना धक्का?; भाजप संगमनेरमधून तिकीट नाकारण्याची शक्यता, कारणही आलं समोर!
9
"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचा झिशान सिद्दिकींविरोधात उमेदवार ठरला! वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार
11
मालाडमध्ये रिक्षाचालकांकडून मनसे कार्यकर्त्याच्या मुलाची हत्या; राज ठाकरेंनी घरी जाऊन केलं सांत्वन
12
Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार
13
"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा
14
"आमचे सरकार आल्यास दारूबंदी हटवली जाईल", प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
15
मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
16
Raj Thackeray: मनसेला मुंबईत यंदा नवनिर्माणाची संधी? काय सांगतं राजकीय गणित?
17
बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी
18
राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या: भाजपच्या वासुदेव काळेंनाही निष्ठेचं फळ; कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा!
19
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: राजकीय घडामोडींना आला वेग! हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार?

कृषिपंप व यंत्रमागधारकांना ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान

By admin | Published: August 17, 2015 1:23 AM

कमी दरात कृषिपंप देण्याकरिता शासनाने निवडला सौरपंपाचा पर्याय.

अकोला : शेतात विद्युत पुरवठा देण्याकरिता खांब, तार व रोहित्रांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत असून, आतापर्यंत राज्य शासनाने कृषिपंप व यंत्रमागधारकांना ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान दिले आहे. तसेच हा अवाढव्य खर्च टाळून शेतकर्‍यांना कमी दरात कृषिपंप देण्याकरिता शासनाने सौरपंपाचा पर्याय निवडला आहे. आतापर्यंत राज्यात ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान दिल्यावरही २0११ पासून दीड लाखांपेक्षा जास्त कृषिपंपाचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांनी नियमानुसार पैसेही भरले आहेत. शेतकर्‍यांकडे पाण्याचीही व्यवस्था आहे. मात्र, राज्य शासनाकडील मुबलक निधीअभावी शेतकर्‍यांना कृषिपंप जोडण्या देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून, त्वरित कृषिपंप देण्याची मागणी जोर धरीत आहे. राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या मोठय़ा प्रमाणात आत्महत्या झाल्या आहेत. या भागात सिंचनाच्या सुविधेत वाढ व्हावी, यासाठी महावितरणतर्फे या भागात एकूण ७ हजार ५४0 सौरपंप देण्यात येणार आहे. या भागांशिवाय महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेला लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या जिल्हय़ातील गावातील शेतकरी, वनविभागाच्या नाहरकत प्रकारामुळे विद्युतीकरण न झालेल्या भागातील शेतकरी किंवा महावितरणकडे पैसे भरूनही ज्यांना तांत्रिक कारणांमुळे जवळच्या काळात वीज पुरवठा देणे शक्य झाले नाही, अशा शेतकर्‍यांनाही सौरपंप दिले जाणार आहे.