शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रतलाम-खंडवा-अकोला रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:23 IST

अकोला : उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सर्वात सरळ व कमी अंतराचा रतलाम-खंडवा- अकोला-नांदेड मार्गे हैदराबाद हा रेल्वे कॉरिडाॅर ...

अकोला : उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सर्वात सरळ व कमी अंतराचा रतलाम-खंडवा- अकोला-नांदेड मार्गे हैदराबाद हा रेल्वे कॉरिडाॅर पूर्णत्वास जाण्याच्या मार्गात आधीच अकोट ते आमलाखुर्द दरम्यानच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचा अडथळा असताना, आता आणखी एक नवे विघ्न समोर आले आहे. या लोहमार्गातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महु ते सनावद दरम्यानच्या गेज परिवर्तनासाठी मंजूर झालेला निधी इंदूर-दाहोद रेल्वेलाइनसाठी वळविण्याची मागणी इंदूरचे खासदार शंकर लालवाणी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ३० ऑगस्ट रोजी पाठविलेल्या एका पत्राद्वारे केली आहे. हा निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेजचे काम थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील रतलाम ते अकोला या ४७२ किमी लांबीच्या मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्यासाठी केंद्र सरकारने २००८ मध्ये हिरवी झेंडी दिली होती. या प्रकल्पात आतापर्यंत रतलाम ते महु, सनावद ते खंडवा व अकोट ते अकोलापर्यंतच्या टप्प्यांचे गेज परिवर्तन झाले असून, महु ते सनावद या ५४ किमी टप्प्याचे गेज परिवर्तन अद्याप बाकी आहे. या कामासाठी ३२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या हे काम बंद असल्यामुळे या कामासाठी मंजूर असलेल्या निधीपैकी १५० कोटींचा निधी इंदूर ते दाहोद या रेल्वे लाईनसाठी वळता करावा, अशी मागणी करणारे पत्र इंदूरचे भाजप खासदार शंकर लालवाणी यांनी ३० ऑगस्ट रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविले आहे. हे काम आणखी दोन वर्षे सुरु होण्याची शक्यता नसल्याचा तर्क त्यांनी दिला आहे. दिल्ली दरबारात राजकीय वजन असलेल्या लालवाणी यांची मागणी मंजूर होऊन निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेज परिवर्तनाच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो.

व्याघ्र प्रकल्पामुळे अकोट ते अमला खुर्द काम ठप्प

रतलाल - खंडवा - अकोला लोहमार्गाचे बहुतांश गेज परिवर्तन झाले असून, अकोट ते अमला खुर्दपर्यंतचे ७७ किमी गेज परिवर्तनाचे काम रखडलेले आहे. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्यामुळे गेज परिवर्तनाचे काम बाहेरून वळते करावे, अशी याचिका पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्य शासनानेही मेळघाटातून ब्रॉडगेजचे काम होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्यातरी हे काम मार्गी लागण्याची शक्यता नाही.

खंडवा ते अमला खुर्द काम सुरु

गेज परिवर्तन प्रकल्पात अकोट ते अमला खुर्द काम ठप्प असले तरी खंडवा ते अमला खुर्दपर्यंतच्या ५३ किमी मार्गाच्या गेज परिवर्तनाचे काम धिम्या गतीने सुरु आहे. गिरहीपर्यंत पूल व इतर कामे झालेली आहेत. त्यामुळे गेज परिवर्तनाचे काम मेळघाटामधूनच जाईल अशी आशा या मार्गाच्या समर्थकांमध्ये अजूनही जागृत आहे.