शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

चार गावांत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मंजुरी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By संतोष येलकर | Updated: June 23, 2024 14:41 IST

कूपनलिका, विंधन विहिरींची कामे

अकोला : पावसाळा सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी, जिल्ह्यात अद्याप सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईची समस्या कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर चार गावांतील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवार, दि. २१ जून रोजी दिला. त्यामध्ये तीन कूपनलिका व एक विंधन विहिरीच्या उपाययोजनांचा समावेश आहे.

यंदाचा उन्हाळा संपला असून, गेल्या दि. १ जूनपासून पावसाळा सुरू झाला. वीस दिवस उलटून गेले; मात्र जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पाऊस अद्याप बरसला नसल्याने, पावसाळ्यातही जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईच्या समस्येचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. त्यानुषंगाने १ ते ३० या कालावधीसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या पूरक कृती आराखड्यास पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली आहे. पूरक कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांपैकी तेल्हारा व अकोट या दोन तालुक्यांतील चार गावांतील पाणीटंचाई निवारणासाठी तीन कूपनलिका व एक विंधन विहीर अशा चार उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकारी कुंभार यांच्या आदेशानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

मंजूर केलेल्या अशा आहेतगावनिहाय उपाययोजना !तालुका गाव उपाययोजनातेल्हारा भोकर १ कूपनलिकातेल्हारा भिली १ विंधन विहीरअकोट पिंप्री खुर्द १ कूपनलिकाअकोट ताजनापूर १ कूपनलिका

३० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश !प्रशासकीय मंजुरी दिलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे ३० जूनपर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करून, त्याद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यात यावा आणि संबंधित गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

टॅग्स :Waterपाणी