शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
3
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
4
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
5
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
6
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
7
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
8
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
9
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
10
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
11
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
12
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
13
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
14
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
15
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
16
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
17
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
18
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
19
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
20
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई!

By admin | Published: May 19, 2014 7:18 PM

शेतकर्‍यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करून द्यावे, शेतकर्‍यांचे अकोला जिल्हाधिकार्‍यांना साकडे.

अकोला : यंदा मान्सून वेळेवर सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे; परंतु बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई भासवून अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विकले जात आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करू न द्यावे, यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आज सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना साकडे घातले.

     मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग,ज्वारीसह सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे झाले होते. रब्बी पिकेही अवकाळी पावसाने ध्वस्त केली. यामुळे आर्थिक परिस्थितीला तोंड देत असताना यावर्षी सोयाबीन बियाण्याचे भाव वाढल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. बाजरात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. महाबीजच्या सभासद शेतकर्‍यांनी महाबीजला ४० ते ४५ रुपये प्रती किलोने सोयाबीन बियाणे विकले. तथापि, तेच बियाणे शेतकर्‍यांना आता ७५ रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील सोयाबीन सुरुवातीला अडीच हजार रुपये प्रती क्विंटल विकले आहे. तथापि, शेतकर्‍यांना केवळ ३० किलो बियाण्यांचा बॅगसाठी तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. शेतकर्‍यांची ही लूट थांबविण्यासाठी कृषी अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा यंदा शेतकर्‍यांना जमिनी पडीत ठेवाव्या लागतील. या संदर्भात सोमवारी शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना साकडे घातले व एक निवेदनही सादर केले.

      यावर जिल्हा कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी सोयाबीनचे ३५ ते ४० हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध आहे. दर एमआरपीनुसार आहेत; परंतु कोणी जास्त भावाने बियाणे विकत असेल तर त्या कृषी सेवा केंद्राचे अधिकृत नाव द्यावे किंवा तशी पावती आणावी, त्यावर लगेच कारवाई केल जाईल, असे आश्‍वासन दिले.