शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

Arun Jaitley Death: भाजपासोबतच राष्ट्राची मोठी हानी - संजय धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 16:42 IST

माजी वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने भाजप तसेच देशाची मोठी हानी झाल्याच्या संवेदना केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केल्या.

अकोला : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने भाजप तसेच देशाची मोठी हानी झाल्याच्या संवेदना केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केल्या. विद्यार्थी दशेपासूनच लढाऊ बाणा अंगी असलेल्या माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आयुष्यभर भाजपाचे ध्येय धोरण व विचारसरणी समोर ठेऊन देशहितासाठी कार्य केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासून नेतृत्व गुण विकसित, अधिक परिपक्व, व्यापक बहु आयामी अभ्यासू, विधीतज्ञ, आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांचे आंदोलनात अग्रणी नेतृत्व होते. जेष्ठ मार्गदर्शक व चांगले सहकारी अरुण जेटली यांच्या निधनाने या पंधरवड्या दुसरा धक्का बसला असून, पक्षासोबत राष्ट्राची मोठी हानी झाल्याचे संजय धोत्रे म्हणाले. आज संजय धोत्रे यांनी त्यांचे संपूर्ण कार्यक्रम रद्द करून जेटलींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

भाजपाने चाणक्य गमावला - गोवर्धन शर्माभारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व विख्यात कायदेतज्ज्ञ आणि भाजपाला संसदेपासून रस्त्या पर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली यांच्या निधनाने पक्षाची फार मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली.

लोकशाहीचे पाईक अरुण जेटली - रणधीर सावरकरविद्यार्थ्यांचे संघटन उभारून आणि बाणीच्या काळात बातमीपत्र तयार करून लोकशाही मजबूत केली तसेच मिसा विरुद्ध जन आंदोलन करून विविध विषयांवर अभ्यास करून आर्थिक क्षेत्र तसेच मंत्रिमंडळात विविध पदे भूषवून त्या पदांना न्याय देणारे लोकशाहीचे पाईक अरुण जेटली यांच्या निधनाने प्रखर नेतृत्व, प्रखर वक्ता हरपल्याची प्रतिक्रिया आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीSanjay Dhotreसंजय धोत्रेBJPभाजपा