शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना ‘अथार’ चा आधार !

By admin | Published: June 24, 2016 11:43 PM

पेरणीसाठी मदतीचा हात; शेतक-यांना दिले जाते जेवण.

नाना हिवराळे / खामगावगेल्या तीन वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच महागाईने कंबरडे मोडले असून खरिपातील पेरणीच्या सोयीसाठी शेतकरी प्रयत्नरत आहेत. दरम्यान, पेरणीसाठी वाढलेला खर्च शेतकर्‍यांना झेपावणारा नसल्यामुळे ग्रामीण भागातील पेरणीची अथार ही पद्धत शेतकर्‍यांना आधार ठरणार आहे.शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी आदी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. बैलाची संख्या कमी असल्याने पेरणीचा अवाजवी खर्च शेतकर्‍यांना पेलावा लागत आहे. सायळ पद्धतीने पेरणी केली जात असे यामुळे पेरणीच्या खर्चाची बचत होत असे; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दुसर्‍याकडून पेरणी करताना शेतकर्‍यांना ट्रॅक्टरने ४00 रुपये प्रती एकर तर बैलजोडीने ७00 रुपये एकर किंमत मोजावी लागत आहे. अगोदरच सततच्या दुष्काळाने शेतकरी पार खचला आहे. गत तीन वर्षांपासून शेतीतून पेरणीच्या खर्चाऐवढेही उत्पन्न निघाले नसल्याने दरवर्षी कर्जाचे पुनर्गठन सुरू आहे. यामुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे. बी-बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ग्रामीण भागात फार पूर्वीपासून पेरणीची अथार पद्धत प्रचलित होती; मात्र काळाच्या ओघात काही प्रमाणात ती मागे पडली आहे. परंतु सद्यस्थितीत हीच अथार पद्धत शेतकर्‍यांना आधारवड ठरू शकते. गावातील ज्या शेतकर्‍याकडे पेरणीसाठी बैलजोडी नसेल व त्यांची आर्थिक स्थिती नाजूक असेल तर अशा शेतकर्‍यांची शेती पडीक राहू नये याकरिता इतर शेतकरी त्या शेताची पेरणी करीत असत. या पेरणीसाठी लागणार्‍या खर्चाची रक्कम न घेता त्या शेतकर्‍याजवळून केवळ मोबदला म्हणून एक वेळचे जेवण घेतले जायचे. यामुळे गरीब शेतकर्‍यांना अथार पद्धतीचा आधार होत असे.