शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

मागासवर्गीयांचे उद्योग उभारण्यासाठी सर्वोत्तम काळ  - ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा ‘डिक्की’च्या माध्यमातून हा अल्प प्रयत्न असल्याची माहिती दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी गुरुवारी येथे दिली.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपासून पंतप्रधान यांनी ही योजना कार्यान्वित केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.महिला उद्योजकांना डिक्की प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला अकोल्याचे उद्योजक सुगत वाघमारे, ‘डिक्की’चे जिल्हा समन्वयक रवींद्र घनबहादूर आदींची उपस्थिती होती.

अकोला : मागासवर्गीयांचे उद्योग उभारण्यासाठीचा सध्या सर्वोत्तम काळ असून, शासनाच्या ‘स्टँडअप’,‘मेक इन महाराष्टÑ’ ‘स्टार्टअप’ योजनेंतर्गत शेकडो मागासवर्गीयांनी उद्योग उभे केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा ‘डिक्की’च्या माध्यमातून हा अल्प प्रयत्न असल्याची माहिती दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी गुरुवारी येथे दिली.मागासवर्गीय उद्योजकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी कांबळे येथे आले होते. याप्रसंगी एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागासवर्गीयांचे (अनुसूचित जाती-जमाती) उद्योग उभारण्यासाठी ‘डिक्की’ सरकारच्या धोरणात्मक निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावत असून, उद्योगांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ उभे केले आहे. एवढेच नव्हे, उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण केली असून, चार टक्के माल खरेदी करण्यासाठीचा कायदाच केल्याने २४ हजार कोटींची उत्पादने शासनाने खरेदी करणे अनिवार्य केले आहे. अनुसूचित जाती ,जमाती हब निर्माण केले. उद्योगांचे स्वरू प पाहून ५० लाख, ५० कोटींपर्यंतचे कर्ज उद्योग उभारण्यासाठी देण्यात येत आहे. देशात २७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. या बँकांच्या १२५ शाखांमधून एका उद्योजकाला अर्थसाहाय्य केल्यास देशात १२५ नवे मागासवर्गीय उद्योजक निर्माण होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपासून पंतप्रधान यांनी ही योजना कार्यान्वित केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.राज्य शासनाने ‘मेक इन महाराष्ट्र’ योजनेंतर्गत प्रोत्साहन योजना सुरू केली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक औद्योगिक वसाहतीतीत (एमआडीसी) २० प्लॉट राखीव ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. आतापर्यंत १५ औद्योगिक वसाहतीमध्ये १२० मागासवर्गीयांना प्लॉट देण्यात आले असून,१० लाख रू पये अनुदान आहे.तसेच उद्योग उभारण्यासाठी २५ टक्के भांडवली गुतणवूकीसाठी अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मुद्रा योजनेंतर्गत १२ कोटी लोकांना ऋण देण्यात आले. सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत उद्योग उभारण्यासाठी मागासवर्गीयांमध्ये क्षमता बांधणीचे काम करण्यात येत आहे. महिला उद्योजकांना डिक्की प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. पेट्रोलियम मंत्रालयांतर्गत तेल, गॅस वाहतूक व इतर कामे आता मागासवर्गींयाना मिळत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला अकोल्याचे उद्योजक सुगत वाघमारे, ‘डिक्की’चे जिल्हा समन्वयक रवींद्र घनबहादूर आदींची उपस्थिती होती.

 आता अकोल्यात पैठणीअकोल्यात पहिला पैठणी निर्मितीचा उद्योेग माधुरी गिरी यांनी सुरू केला असून, मिलिंद कांंबळे यांच्या हस्ते गुरुवार, ५ जुलै रोजी या उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले, यानंतर त्यांनी मेळाव्याला संबोधित केले.

 

टॅग्स :Akolaअकोला