शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
2
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
3
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
4
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
6
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
7
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
8
Mithun Chakraborty: अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, म्हणाले, "काळ्या रंगामुळे मला..."
9
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
10
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
11
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
12
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
13
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
14
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
15
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?
16
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद
17
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
18
निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ
19
जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त
20
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...

इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या भूलथापापासून सावध

By admin | Published: May 20, 2014 12:42 AM

अकोलाशहराबाहेरील अनेक इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कंपन्या, कन्सलटन्सी एजन्सी शहरात येऊन कोणतीही वैधानिक मान्यता नसताना कार्यालये थाटतात आणि नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवितात. आवळा देऊन भोपळा काढण्याची या कंपनी संचालकांची खोड जुनीच आहे. त्यांच्या आमिषाला बळी पडून दररोज कुठे ना कुठे, नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी अलीकडे वाढू लागल्या आहेत.

अकोला: शहराबाहेरील अनेक इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कंपन्या, कन्सलटन्सी एजन्सी शहरात येऊन कोणतीही वैधानिक मान्यता नसताना कार्यालये थाटतात आणि नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवितात. आवळा देऊन भोपळा काढण्याची या कंपनी संचालकांची खोड जुनीच आहे. त्यांच्या आमिषाला बळी पडून दररोज कुठे ना कुठे, नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी अलीकडे वाढू लागल्या आहेत. या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश भुयार यांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वीच शहरात नागपूरच्या श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचे समीर जोशी, पल्लवी जोशी व त्यांचे एजंट मोहन पितळे, मुकुंद पितळे, मंगेशी पितळेसह चार एजंटांविरुद्ध रामदासपेठ व खदान पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. शहरातील गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांनी श्रीसूर्या कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप केला. यासोबतच शहरात दररोज नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे घडत आहेत. राज्याबाहेरील अनेक इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कंपन्या शहरात येऊन नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून आमिष दाखवितात आणि कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगतात. काही महिने गुंतवणूकदाराला योजनेचा लाभ देतात. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली की आपला गाशा गुंडाळतात. नंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. यापूर्वी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. पैसे गुंतवणूक केलेल्या कंपनीची माहिती घेऊन, त्याबाबत खात्री करावी, असेही आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश भुयार यांनी सांगितले. छाया: इंटरनेटवरून आर्थिक गुन्ह्यांशी संबधित छायाचित्र वापरावे बातमीत बॉक्स आहेत. बॉक्स : मान्यता नसलेल्या कंपन्या याचा घेतात आधार नागरिकांचा विश्वास संपादन करायचा असल्याने कोणतीही वैधानिक मान्यता नसलेल्या फायनान्स कंपन्या, इन्व्हेस्टमेंट कंपन्या, संस्था कार्यालयाच्या फलकावर नोंदणी क्रमांक म्हणून शॉप ॲक्ट लायसन्स क्रमांक, पॅनकार्ड क्रमांकाचा आधार घेतात आणि शासनाची मान्यता असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करतात. अशा कंपन्यापासून नागरिकांनी सावध राहावे.