अकोला : जगभर कोरोनाचे भीषण संकट गत वर्षापासून घोंगावत आहे. राज्यातही कोरोणाचे प्रमाण वाढले असतानाही, लाचखोरी मात्र सुरूच असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. अकोला जिल्ह्यात २०२० या वर्षात १८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली, तर २०२१ या वर्षातील पाच महिन्यांत चार लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे. यामध्ये महसूल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपन्या आणि इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे.
शासकीय कार्यालयात काम अडल्यानंतर, तसेच शासकीय कंत्राटदार व इतररांची बिल काढण्यासाठी प्रत्येक टेबलवर लाच मागितल्या जाते. त्यामुळे अशा लाचखोरावर कारवाई करण्यासाठी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहेत. एक वर्षापासून कोरोणाचे संकट असल्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज कमी प्रमाणात सुरू आहे, तर अनेकांची कामे अडलेली आहेत. त्यामुळे ही कामे करण्यासाठी लाच मागणाऱ्या चार जणांवर २०२१ या वर्षात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे.
कोणत्या वर्षात किती कारवाया
२०१८ - २३
२०१९ -१९
२०२० - १८
२०२१ - ०४
कोरोना काळात महसूलची वरकमाई जोरात
विभाग। कारवाया
महसूल। ०५
पोलीस। ०३
वनविभाग। ०१
वीज वितरण कंपन्या। ०२
नगरविकास। ०२
ग्रामविकास। ०३
अन्न व नागरी पुरवठा। ०१
बांधकाम। ०१
सहकार। ०१
इतर लोकसेवक ३
सर्वात जास्त कारवाया अकोला तालुक्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत अकोला तालुक्यात सर्वाधिक कारवाया केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, अकोला तालुक्यात ९ पेक्षा अधिक लाचखोरांना अटक करण्यात आली असून, त्या खालोखाल अकोट तालुक्यातील लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचे भीषण संकटात असतानाही लाचखोरी मात्र सुरूच असल्याचे यावरून दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरुवातीपासून भीषण आहे. या वर्षात तर कोरोनाचा आलेख हा प्रचंड वाढलेला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही काही शासकीय अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षात चार जणांवर कारवाई केलेली आहे.
शरद मेमाने, उपअधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला