शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
3
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
4
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
5
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
6
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
7
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
8
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
9
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
10
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
12
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
13
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
14
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
15
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
16
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
17
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
18
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
19
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
20
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

शहरातील व्यापारी, दुकानदार, कामगारांच्या कोविड चाचण्या तातडीने पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:35 AM

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्याच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून शहरातील व्यापारी, दुकानदार व त्यांच्याकडे काम करणारे कामगार, ...

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्याच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून शहरातील व्यापारी, दुकानदार व त्यांच्याकडे काम करणारे कामगार, कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिले. चाचण्यांसाठी व्यापारी संघटनांनी व्यावसायिकांसह कामगार व कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाला उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित व्यापारी संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळेकर, उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्यासह एमआयडीसी असोसिएशन, होलसेल व्यापारी असोसिएशन, ग्रेन मर्चंट असोसिएशन, मंगल कार्यालय चालक असोसिएशन, किराणा मर्चंट असोसिएशन, एलपीजी वितरक असोसिएशन, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, केटरर्स असोसिएशन इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी दिवसभरात अनेक लोकांच्या संपर्कात येणारे विविध दुकानदार व त्यांचे कामगार, कर्मचाऱ्यांच्या चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापारी असोसिएशनने प्रशासनाला असोसिएशननिहाय चाचण्यांचे वेळापत्रक तयार करून द्यावे. या चाचण्यांसाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय वृत्तपत्र विक्रेते हॉकर्स, दूधवाले यांच्यासारख्या घरोघरी जाणाऱ्या घटकांच्याही चाचण्या करण्याचे नियोजन प्रशासन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगल कार्यालयाच्या चालकांनी विवाह आयोजकांची लेखी हमी घेऊन, ५०पेक्षा अधिक एकही व्यक्ती अधिक उपस्थित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिला.

दागिने, लग्नाचा बस्ता खरेदीसाठी

पाचपेक्षा अधिक लोक नको!

रस्त्यावर फिरणारे, फेरीवाले यांच्यावर कोविड प्रतिबंधात्मक उल्लंघनाबाबत प्रशासन कारवाई करीत असून, दागिने व लग्नाच्या बस्ता खरेदीसाठीही पाचपेक्षा अधिक लोक येणार नाहीत, याची दक्षता स्वतः दुकान चालकांनी घ्यावयाची आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गॅस ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंगचा पर्याय अवलंबावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीतही येणारे लोक हे मास्कशिवाय येणार नाहीत, याची खबरदारी बाळगण्याचे त्यांनी स्पष्ट केले.