शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:44 IST

भाजपाच्या लाटेने पूर्णपणे वाहून गेलेल्या काँगे्रसला उभारी देण्यासाठी बाहेरून नेतृत्व येणार नाही. येथीलच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, विश्वास टाकावा लागेल.

- राजेश शेगोकारअकोला: दोन वर्षांपूर्वी अकोला महानगर काँग्रेस अध्यक्ष पदावर बबनराव चौधरी यांची नियुक्ती झाल्यानंतर येथील तरुण पदाधिकाऱ्यांनी एल्गार पुकारत या नियुक्तीला विरोध करून चक्क आत्मक्लेष आंदोलनही केले होते; मात्र काँग्रेसच्या हायकमांडने त्यांच्या निर्णयात कोणताही बदल केला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी उमेदवार निश्चित करताना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांच्याऐवजी शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी देण्याची मागणीही बेदखल करण्यात आली तर अकोल्यातून मुस्लीम उमेदवार देऊ नये, या कार्यकर्त्यांच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. २०१४ च्या मोदी लोटेने गलितगात्र झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतून मनोबल देत कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचाच विचार केला गेला नाही. त्यामुळे २०१९ च्या दारुण पराभवानंतर काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे, असा प्रश्न अनेक पदाधिकाºयांच्या चर्चेतून समोर आला आहे.अकोल्यात गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसला स्वबळावर लोकसभा मतदारसंघ जिंकता आलेला नाही. भाजपाने लागोपाठ विजय मिळवित अकोल्याच्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आव्हानच मोडून काढले आहे. या पृष्ठभूमीवर पक्षाची विचारधारा जिवंत ठेवत काम करणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी ‘बदल’ होईल, या आशावादावर काम करीत होती. २०१९ मध्ये नव्या दमाचा उमेदवार देऊन काँगे्रस पक्ष कार्यकर्त्यांना चैतन्य देईल, ही अपेक्षा फोल ठरली अन् त्याच ठिकाणी काँग्रेसच्या पराभवाचा पाया रचला गेला. पटेल यांचे नाव जाहीर होताच, काँग्रेसच्या गोटातून सर्वांनीच काँग्रेसश्रेष्ठींच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. खासदार संजय धोत्रे यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याची ताकदच काँग्रेसची नव्हती. डॉ. अभय पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्या उमेदवारीचे वारे मतदारसंघात फिरविले अन् ऐनवळी तांत्रिक कारणांनी घात झाल्याने पटेल यांच्या रूपाने मुस्लीम समाजाला खूश करण्याचा प्रयोग काँग्रेसने पुन्हा एकदा केला; मात्र हा प्रयोग काँग्रेसच्या विजयासाठी कमी अन् अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची कोंडी करण्यासाठी अधिक होता, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसनेच ‘काँग्रेस’चा ‘गेम’ केला आहे.खरे तर काँग्रेसचे संघटन केवळ कागदावरच उरले आहे. संघटनेत बदल नाही, नव्या चेहºयांना स्थान नाही, अजूनही सत्तेत आहोत अशा स्वरूपाच्या वागण्यात बदल नाही, दुसºया फळीची निर्मितीची नाही, अशी अनेक नकारात्मक कारणांची मोठी यादी सांगता येईल. मोदी लाट हे काँग्रेसच्या परिणामांचे एकमेव कारण नाहीच, भाकरी न फिरविणे हेही सर्वात मोठे कारण आहे. मोदी लाटेतही दुसरा क्रमांक टिकविणारी काँग्र्रेस आज तिसºया क्रमांकावर फेकली गेली आहे. याउलट मुस्लीम मतांमध्ये मोठे धु्रवीकरण न करताही अ‍ॅड. आंबेडकरांची ‘वंचित’ आघाडी दुसºया क्रमांकावर गेली. याचे कारण त्यांनी बदल केला. भारिप-बमसं पक्ष विलीन करण्याचीही हिंमत दाखविली. दुसरीकडे सर्वकाही संपले असतानाही काँग्रेस बदल स्वीकारायला तयार नाही. यामध्येही पराभवाचे कारण दडलेले आहे. भाजपाच्या लाटेने पूर्णपणे वाहून गेलेल्या काँगे्रसला उभारी देण्यासाठी बाहेरून नेतृत्व येणार नाही. येथीलच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, विश्वास टाकावा लागेल. एकाच निवडणुकीत बदल होईल, अशी अपेक्षा न ठेवता नव्या दमाची संघटना बांधावी लागेल. त्याची सुरुवात येत्या विधानसभा निवडणुकीत करावी लागेल. त्यासाठी ‘भाकरी’ फिरविणे हाच उपाय आहे, अन्यथा आज भाकरी करपली आहे म्हणून २२ टक्के मतदार तरी सोबत आहेत. उद्या भाकरी पूर्णपणे जळून गेल्यावर काँग्रेसचा पंजा उंचावयालासुद्धा ‘हात’ राहणार नाही!

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल