शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
2
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ
3
अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप
4
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट
5
समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी
6
"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता
8
मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय
9
सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 
10
नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 
11
जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा
12
ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
13
स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना
14
राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
15
‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले
16
सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत
17
मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
19
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
20
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

बंजारा संस्कृतीतील विचारधनास ग्रंथरूप देण्यासाठीच संमेलन

By admin | Published: February 01, 2016 2:12 AM

बंजारा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांचे प्रतिपादन.

वाशिम : बंजारा समाजाची संस्कृती प्राचीन असून, मौखिक स्वरूपात आहे. तांडा संस्कृती ही आतापर्यंत केवळ मौखिक स्वरूपात होती, ती पुस्तकबद्ध होऊन लिखित स्वरूपात यावी, याकरिता ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्राच्यावतीने अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांनी रविवारी येथे व्यक्त केले. अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन वाशिम येथील विठ्ठलवाडीत ६ व ७ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले. या संमेलनाची माहिती देण्याकरिता रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून संमेलनाचे अध्यक्ष औरंगाबाद येथील प्राचार्य गबरूसिंग चव्हाण, स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, सुभाष राठोड, आर. डी. राठोड, एन. टी. जाधव, अँड. जगदीश पवार, प्रेम राठोड, प्रा. विजय राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ टी. सी. राठोड म्हणाले, की राष्ट्रीय स्तरावरील वाशिम येथे होणारे हे पहिले संमेलन आहे. समाजातील साहित्यिकांना एक पीठ निर्माण व्हावे, याकरिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा समाजाच्या अतिप्राचीन संस्कृतीवर प्रकाशझोत टाकून आजच्या तरुणांना या सांस्कृतिक वारशाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्ती करण्यात येणार असल्याचे गबरूसिंग चव्हाण म्हणाले. बंजारा समाज हा तांड्यात राहणार आहे. तसेच श्रमीक संस्कृतीचा उपासक आहे. येथे मातृसत्ताक संस्कृती होती. नवीन संशोधकांनी याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. या संमेलनात देशातील आठ ते नऊ राज्यांतील साहित्यिकांचा सहभाग राहणार आहे. पत्रकार परिषदेचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विजय जाधव यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा संमेलनात ६ फेब्रुवारी राजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी पोहरादेवी येथील संत रामराव महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर १0.३0 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य गबरूसिंह राठोड राहणार आहेत. स्वागताध्यक्ष एआयबीएसएसचे राज्य अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड आहेत. उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार मनोहर नाईक करतील. प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, लक्ष्मणराव गायकवाड, भिमणीपुत्र मोहन नाईक यांची राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल राज्यमंत्री संजय राठोड, एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. शंकर नाईक, तेलंगणातील खासदार सीताराम नाईक, एआयबीएसएसचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष राजूसिंह नाईक, आ. हरिभाऊ राठोड, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मखराम पवार, किनवटचे आमदार प्रदीप नाईक, एआयबीएसएसचे कार्यकारी अध्यक्ष अमरसिंह तिलावत, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचा सामावेश राहणार आहे. दुपारी २ वाजता ह्यबंजारा साहित्य प्रेरणा - दशा, दिशा और स्वरूपह्ण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ४ वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी ह्यबंजारा समाज के महामानवों का मानवतावादी दृष्टिकोनह्ण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता ह्यबंजारा समाज की वर्तमान समस्याएं एवम् उपायह्ण यावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ५ वाजता समारोप होणार असून, अध्यक्षस्थानी राजाराम जाधव राहणार आहेत.