शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

कोरोना कमी होतोय; वीकेंडचे निर्बंध हटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 10:34 IST

When will the weekend restrictions be lifted : लॉकडाऊनमुळे नुकसान सोसाव्या लागणाऱ्या व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती सावरली नाही.

अकोला : गत दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे; मात्र जिल्ह्यात शनिवार व रविवारी निर्बंध कायम आहे. आधीच लॉकडाऊनमुळे नुकसान सोसाव्या लागणाऱ्या व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती सावरली नाही. त्यात वीकेंडचे निर्बंध अद्यापही न हटल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे वीकेंडचे व दररोज सायंकाळी चारपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे निर्बंध हटणार कधी, असा प्रश्न विचारला जात आहे. कोरोनाच्या काळात व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. पहिल्या लाटेत नुकसान सोसावे लागल्यानंतर दुसऱ्या लाटेने व्यापाऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात अद्यापही निर्बंध कायम असून, सायंकाळी चारपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. तसेच शनिवार, रविवार वीकेंडचे निर्बंधही कायम आहे; मात्र जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दिवसाला केवळ पाच-सहा रुग्ण पाॅझिटिव्ह येत आहे. यासोबत मृत्यूचे प्रमाणही घटले आहे; परंतु जिल्ह्यात अद्यापही वीकेंडचे व सायंकाळी चारपर्यंत निर्बंध कायम असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. रुग्णसंख्या घटल्याने वीकेंडचे निर्बंध हटविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

बेरोजगारीचे संकट गडद

कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगारही अडचणी आले आहे. व्यवसाय होत नसल्याने जास्त अर्थचक्र कोलमडले असून, जास्त कामगारांना कामावर ठेवण्याची गरज व्यावसायिकांना भासत नाही. त्यामुळे बेरोजगारीचे संकट आणखी गडद झाले आहे.

 

खरंच गरज आहे का?

शहरात इतर दिवसांप्रमाणे शनिवार, रविवारीदेखील गर्दी दिसून येते. तसेच दररोज सायंकाळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ असतो. आता रुग्णसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे निर्बंधांची खरंच गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शनिवार, रविवारी सुटी असल्याने ग्राहक याच दिवशी खरेदीसाठी येतात. या दोन दिवसांमध्ये चांगला व्यवसाय होतो. आता कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे वीकेंड निर्बंधांची मुळीच आवश्यकता दिसून येत नाही.

- भीकमचंद अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक

 

जिल्ह्यात रुग्ण कमी झाले आहे. बहुतांश नागरिकांचे लसीकरणही झाले आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटविण्याची गरज आहे. वीकेंड निर्बंधांचीही गरज नाही. शासनाने हे सर्व निर्बंध हटविणे आवश्यक आहे.

- किशोर मांगटे, कपडा व्यावसायिक

निर्बंध असल्याने छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहे. अपेक्षित व्यवसायही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने किमान सायंकाळची वेळ सातपर्यंत करणे आवश्यक आहे.

- रिषी जाधवाणी, फुटवेअर व्यावसायिक

 

निर्बंधांमुळे फळ व्यवसाय मंदावला आहे. फळ व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होत आहे. सायंकाळी चारनंतर फळांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची गरज आहे. तसेच वीकेंड निर्बंधही हटवावी.

- मुजाहिद खान, फळ व्यावसायिक

 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकAkolaअकोला