शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

पीक लागवडीचा खर्चही निघणार नाही; शेतकरी चिंतेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 2:18 PM

सोयाबीन, कापूस व ज्वारी पिकांचे उत्पादन बुडाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे

- संतोष येलकरअकोला : पावसाळा संपल्यानंतर महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस व ज्वारी पिकांचे उत्पादन बुडाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे पीक लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर महिना उलटून गेला; मात्र परतीचा पाऊस बरसणे सुरूच आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत परतीच्या पावसाने कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. पात्या-फुलेही गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. पावसाच्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाल्याच्या स्थितीत पिकांच्या पेरणी ते काढणीपर्यंत लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.पीक लागवडीचा असा आहे एकरी खर्च!यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस सुरू असल्याने पीक लागवडीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामध्ये पेरणी, डवरणी, निंदण, कीटनाशकांची फवारणी आणि कापणीपर्यंत सोयाबीन पिकाच्या लागवडीवर एकरी १३ ते १५ हजार रुपये, कपाशी पिकाच्या लागवडीवर एकरी २० ते २२ हजार रुपये आणि ज्वारी पिकाच्या लागवडीवर एकरी ६ ते ७ हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च करावा लागला; परंतु परतीच्या पावसाने पिकांचे उत्पादन बुडाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याचे वास्तव आहे.शेतकºयांना आता मदतीची आस!परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून किती आणि केव्हा मदत मिळणार, याबाबत संकटात सापडलेल्या शेतकºयांना आता आस लागली आहे.परतीच्या पावसाने पिकांचे उत्पादन बुडाले आहे. पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना पीक नुकसान भरपाईपोटी सरकारने सरसकट एकरी २५ ते ३० हजार रुपये मदत दिली पाहिजे.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती