शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

कापसाचे क्षेत्र वाढणार!

By admin | Published: May 25, 2014 12:57 AM

अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र सात ते आठ लाख हेक्टर वाढण्याची शक्यता आहे.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र सात ते आठ लाख हेक्टर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याकरिता १६0 लाख बीटी कापसाच्या पाकिटांची गरज भासणार आहे. या दृष्टीने बियाणे कंपन्यांनी व कृषी विभागाने नियोजन केले असल्याचे सांगितले जात असले तरी बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गतवर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकावर भर दिला होता. त्यामुळे एकट्या अमरावती विभागात जवळपास १७.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. तथापि अतवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा फटका बियाण्यांना बसला, परिणामी यंदा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी विभाग पातळीवर वर्तविण्यात येत होती. ती शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारीवरू न काहीअंशी खरी वाटत आहे. अकोला जिल्हय़ात यावर्षी ४0 हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार बियाणे व खतांचे नियोजन केले आहे; परंतु हे नियोजन केवळ कागदावर असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केली आहेत; परंतु अजूनपर्यंत शेतकर्‍यांना योग्य दरात बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्हय़ात ४0 हजार हेक्टर कापसाचे क्षेत्र वाढणार आहे; असा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांना हव्या असलेल्या बीटी कापसाची मागणी बाजारात केली आहे; परंतु नेमके तेच बियाणे शेतकर्‍यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. परप्रांतातील काही कापसाच्या जातीचा मध्यंतरी प्रचार करण्यात आला आहे. बाजारात हवे ते बियाणे मिळणे कठीण झाल्याने काही शेतकर्‍यांनी त्या कापूस बियाण्यांची चौकशी करणे सुरू केले आहे.