शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
8
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
9
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
10
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
11
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
12
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
13
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
14
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
15
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
16
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
17
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
18
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
19
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
20
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन

पीक विम्याची तुटपुंजी मदत; शेतकऱ्यांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या

By रवी दामोदर | Published: July 05, 2024 6:17 PM

अकोला : रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान होऊनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी मदत जमा केली आहे. त्यामुळे ...

अकोला : रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान होऊनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी मदत जमा केली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि.५ जूलै रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. यासंदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारीनुसार पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची टक्केवारी न टाकता केवळ पंचनामा करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनातून केला आहे. आता नुकसानाची भरपाई म्हणून केवळ तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. कुठलेही नियम व निकष न लावता शेतकऱ्यांच्या खात्यात २५ ते ३० हजार रुपये जमा करावे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार करूनही पंचनामे झाले नाहीत, त्यांचे नुकसान ग्राह्य धरून तत्काळ मदत द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, संजय सोनोने, नीतीन गावंडे, गणेश ढोरे, राहूल गुल्हाणे, अशोक गुल्हाणे, हर्षद गावंडे, गोपाल पाठक, जीतेंद्र बोबडे, प्रवीण ठाकरे, शैलेज तायडे, सुरेश काळे आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी