शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

बाबाे! कापशी तलावाची २०० एकर जागा गावकऱ्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:23 AM

ब्रिटिश राजवटीत शहरवासीयांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सुमारे ७०० एकर जागेत कापशी तलावाची निर्मिती करण्यात आली हाेती. या तलावातून शहरापर्यंत ...

ब्रिटिश राजवटीत शहरवासीयांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सुमारे ७०० एकर जागेत कापशी तलावाची निर्मिती करण्यात आली हाेती. या तलावातून शहरापर्यंत बिडाच्या पाइपलाइनद्वारे पाणी आणल्यावर नेहरु पार्क येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जात हाेती. कालांतराने शहराची भविष्यातील लाेकसंख्या विचारात घेता काटेपूर्णा प्रकल्पात जलसाठा आरक्षित करण्यात आला. त्यामुळे कापशी तलावाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष हाेऊन पाण्याचा उपसा बंद झाला. २००६ मध्ये तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर राेकडे यांनी कापशी ते अकाेला शहरापर्यंतची बिडाची जलवाहिनी काढून घेत या तलावातून हाेणारा संभाव्य पाणीपुरवठा कायमचा बंद केला. त्यानंतर या प्रकल्पाकडे प्रशासनाने पाठ फिरवली.

डाॅ.रणजित पाटील यांच्याकडून निधी

शहरवासीयांसाठी निसर्गरम्य पर्यटनस्थळाची निर्मिती करण्याच्या उद्देशातून तत्कालीन नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी मनपा प्रशासनाला सुमारे ३ काेटींचा निधी उपलब्ध करुन दिला हाेता. या निधीतून मनपाने रस्ता व इतर कामे प्रस्तावित केली हाेती. ही कामे पूर्ण झाल्यावर प्रशासनाने दुर्लक्ष केले.

२०० एकर जमिनीवर लागवड

कापशी तलाव ७०० एकर जागेत असून त्यापैकी तब्बल २०० एकर जमिनीवर स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. जमिनीवर साेयाबीन, मूग, उडिद,कपाशी पिकाची लागवड करण्यात आली आहे. मनपाने ७२ जणांना सात दिवसांची नाेटीस दिली असली तरी शेतातील पिके पाहता अतिक्रमणधारक जमिनीवरचा ताबा कसा साेडतील, याकडे लक्ष लागले आहे.

मनपाच्या मालकीच्या जमिनीवर उभारण्यात आलेले अतिक्रमण निश्चितच हटविल्या जाईल. याठिकाणी चांगल्या दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित केल्यास कापशी गावाची भरभराट हाेइल,यात दुमत नाही. तसेच निसर्गप्रेमी,लहान मुले, नागरिकांना पर्याय उपलब्ध हाेइल.

- निमा अराेरा, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त