शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ७०० हेक्टरच्यावर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 17:09 IST

Rain in Murtijapur : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या ७०० हेक्टरच्यावर शेतीवरील पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात ६-७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या ७०० हेक्टरच्यावर शेतीवरील पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाच्या हवाल्या नुसार ४४३ हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.      दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात कहर केला आहे अनेक गावात घरात पाणी शिरले तर पावसामुळे ३४ घरांची पडझड झाली आहे. नदी - नाल्यांना पुर आल्याने त्या काठावरील जमीन पाण्याखाली आल्याने पीकाचे नुकन झाले आहे. त्याच बरोबर इतर महसूल मडळातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीला बांध घातले आहेत अशा शेतकऱ्यांची शेती सुरुवातीपासूनच तुंबलेली आहे, शेतीच्या बांधमुळे शेतातील पाणी वाहून जात नसल्याने शेताला तलावाचे स्वरुप आल्याने पीके पाण्याखाली आली असल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.                 शासनाने तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष तपासणी करावी व शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरRainपाऊसagricultureशेती