शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 10:44 AM

Akola News : सहा महिन्यांत ११२ रस्ते अपघात झाले, यामध्ये ५२ व्यक्तींनी या अपघातांत आपला जीव गमावला.

अकोला : काेरोना महामारीने जनजीवन ढवळून निघाले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना प्राणसही मुकावे लागले. त्यात भरीस भर रस्त्यावर अपघातांतही अनेकांचा मृत्यू ओढवला आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास मरण स्वस्त झाले काय, असे वाटू लागले आहे.

गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे जीवही कोरोना महामारीने गेले. संचारबंदी, लॉकडाऊन असले तरी रस्त्यावरील रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रस्ते अपघातांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मागील सहा महिन्यांत ११२ रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये ५२ व्यक्तींनी या अपघातांत आपला जीव गमावला. गतवर्षी म्हणजे जानेवारी ते मे २०२० या कालावधीत ५१ व्यक्तींनी जीव गमावला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १०३ व्यक्तींपैकी अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे २१ व्यक्ती, डेंजर ड्रायव्हिंग ३९, दारू प्राशन केल्यामुळे १६, चुकीच्या साइडमध्ये वाहन चालविल्यामुळे १२ जण, तर अन्य कारणांमुळे १५ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. महामार्गावर रस्त्यांची उंची कमी-जास्त असणे, जोड रस्त्यांची उंची कमी असणे तसेच ॲप्रोचरोड व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हे सर्व अपघात घडले आहेत. याशिवाय वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त ठेवणे, हेल्मेटचा वापर न करणे, नियमांचा भंग करणे यामुळेही अपघातांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

 

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र व राज्य सरकारने काहीकाळ संचारबंदीची घोषणा केली होती. त्यामुळे रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र लॉकडाऊन काळातही अपघातांची संख्या मोठी आहे. गत दीड वर्षात रस्ते अपघातांत १०३ जणांचा बळी गेला आहे. रस्त्यावर होणारे अपघात हा गंभीर विषय असून, अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्याचे समजते. असे असले तरी अपघात कमी झाले, असे म्हणता येणार नाही. लवकरच महामार्गाचे चाैपदरीकरण हाेणार असल्याने दिलासा मिळणार आहे.

 

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

अपघात वाहनांमध्ये होत असला तरी पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या अपघातांचा धोका आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनाही धोका असल्याचे समोर आले आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

रस्ते अपघातात अनेकदा नियमांचा भंग होत असल्याचे दिसून येते. यात नियमापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करणे, चुकीच्या साइडने वाहन चालविणे या बाबींचा समावेश असतो. ही चूक तरुणाई करीत असल्याचे दिसते.

 

वेळ माैल्यवान, पण जीवन अमूल्य

अपघातानंतर दिनचर्या बदलून गेली आहे. जीवन अमूल्य आहे, याची कल्पना मला आली आहे. आपल्यासोबत इतरांचेही आयुष्य आपण धोक्यात घालत असतो. त्यामुळे वाहन चालवताना सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

- मनोज काळे, अकोला

 

वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. दोन सेकंदांसाठी माझा जीव वाचला, नाहीतर मी आज या जगात नसतो. नशीब बलवत्तर होते म्हणूनच मी बचावलो. म्हणूनच नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे. जेणे करुन अपघात टाळता येईल.

- वैभव बडे

वर्ष

अपघात

जखमी

मृत्यू

२०१८

२१९

१२९

९०

 

२०१९

२७४

१७६

९८

 

२०२०

१६३

११५

५१

 

२०२१ मेपर्यंत

११२

५२

६०

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघात