शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विकासावर हवी चर्चा!

By admin | Published: December 14, 2015 2:43 AM

परिचर्चेत उमटला सूर; केवळ मोर्चे व सहलीचे अधिवेशन ठरू नये.

अकोला: विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन केवळ मोर्चे आणि सहलीपुरतेच ठरू नये, तर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकासाच्या दृष्टीने या अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, असा सूर शनिवारी ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रामुख्याने विदर्भातील शेती, सिंचन व इतर विषयासंबंधी विकासाच्या मुद्यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे; प्रत्यक्षात मात्र विकासाच्या मुद्यावर पाहिजे त्या प्रमाणात या अधिवेशनात चर्चा होत नाही. अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी कमी असतो, आणि उपलब्ध कमी वेळेत विकासाच्या मुद्यावर हवी तशी चर्चा होत नाही. विकासाच्या दृष्टीने नागपूर येथील विधिमंडळाचे अधिवेशन अपेक्षेप्रमाणे उपयुक्त ठरत नाही. विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न आमदारांकडून केले जातात; मात्र विकासाच्या मुद्यांवर हवी तशी भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ मोर्चे आणि लोकप्रतिनिधींच्या सहलीपुरतेच न ठरता, विकासाच्या मुद्यांवर या अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, असे मत विविध राजकीय पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात विकासावर चर्चा करण्याच्या मुद्याला प्राधान्य दिल्या गेले असते तर, विदर्भातील अनुशेष शिल्लक राहिला नसता, त्यामुळे अधिवेशनात विकासाच्या मुद्यावर चर्चेसाठी सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.