शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर वीज व विदर्भ मार्च! - माजी आ. वामनराव चटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 15:07 IST

९ आॅगस्ट रोजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानावर वीज व विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे, अशीही माहिती माजी आ. चटप यांनी दिली.

अकोला: विदर्भामध्ये ६,३00 मेगावॉट वीज तयार होते. त्यापैकी केवळ २,२00 मेगावॉट वीज विदर्भाला मिळते. कमी प्रमाणात वीज उपलब्धतेमुळे विदर्भात सातत्याने भारनियमन करण्यात येते. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज मिळत नाही. विजेच्या दर प्रचंड असून, राज्य शासन विदर्भातील जनतेची लूट करीत असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी करीत, याविरुद्ध विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानावर वीज व विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे, अशीही माहिती माजी आ. चटप यांनी दिली.विजेचे अव्वाच्या सव्वा दर आकारून राज्य शासन जनतेची लुबाडणूक करीत आहे. विदर्भातील जमीन, पाणी, कोळशाचा वापर करून वीज तयार होते. औष्णिक वीज केंद्रामुळे चंद्रपूर, अकोला, नागपूर शहरे प्रदूषित होत आहेत. प्रदूषणामुळे जनतेला कर्करोग, दमा, अस्थमा, हृदयरोगासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. विदर्भाला प्रदूषित करून राज्य शासन पश्चिम महाराष्ट्राला वीज पुरवठा करीत आहे. ६,३00 मेगावॉट वीज तयार करणाºया विदर्भाला केवळ २,२00 मेगावॉट वीज उपलब्ध करून विदर्भात भारनियमन, अधिक दर लादण्यात येत आहे. शेतकºयांच्या कृषी पंपाला वीज मिळत नाही. विदर्भ वेगळा झाला तर ३ हजार मेगावॉट वीज विदर्भाला मिळेल. कृषी पंपांचे भारनियमन संपेल आणि विजेचे दर निम्मे होतील. ग्रामीण भागातील भारनियमन संपेल आणि ११ जिल्ह्यांचे ३0 जिल्हे आणि ३५0 तालुक्यांची निर्मिती होईल. त्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य होणे काळाची गरज आहे. असे सांगत, माजी आ. वामनराव चटप यांनी, देशात सर्वाधिक महाग वीज महाराष्ट्र आहे. विदर्भातील जनतेसाठी विजेचे दर निम्मे झाले पाहिजेत. कृषी पंपाच्या बिलातून शेतकºयांची मुक्तता झाली पाहिजे. यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे प्रत्येक तालुकास्तरावर १ आॅगस्ट रोजी वीज बिल होळी आणि ९ आॅगस्ट रोजी संविधान चौक नागपूर येथून ऊर्जा मंत्र्यांच्या निवासस्थानावर वीज व विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये जनतेने सहभागी व्हावे. अशी माहिती अ‍ॅड. चटप यांनी दिली. पत्रपरिषदेला रंजना मामर्डे, धनंजय मिश्रा, गजानन हरणे, डॉ. नीलेश पाटील, विलास ताथोड, नरेंद्र पुंडकर, सुरेश जोगळे, ऋषिकेश बोंडे, सुरेश देशमुख, सविता वाघ उपस्थित होते.

 

टॅग्स :Wamanrao Chatapवामनराव चटपAkolaअकोला